शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा गावांचे आरोग्य ‘नेवरी’च्या हाती

By admin | Updated: November 11, 2014 00:05 IST

कडेगावचे आरोेग्य केंद्र बंद : अजब कारभाराने नागरिकांत संताप

रजाअली पीरजादे - शाळगाव शाळगाव, कडेगावसह १५ गावांचे आरोग्य नेवरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हाती दिल्याने लोकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कडेगाव येथे यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र होते. त्या अखत्यारित शाळगाव, कडेगाव, शिवाजीनगर, विहापूर, रेणुशेवाडी, सोहोली, चिखली, कडेपूर, हिंगणगाव बु।।, तडसर, नेर्ली, अपशिंगे, कोतवडे आदी गावांचा समावेश होता. या गावांच्या आरोग्य समस्या कडेगाव प्राथमिक केंद्रामार्फत सोडवल्या जात असत. परंतु सध्या कडेगाव येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आल्याने कडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करून ते नेवरी येथे सुरू करण्यात आले आहे. आता आरोग्याच्या काही समस्या निर्माण झाल्या, तर त्यासाठी वरील गावांच्या लोकांना १५ ते २० कि. मी. पायपीट करून नेवरीला हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे लोकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून, कडेगाव येथे पूर्ववत आरोग्यसेवा सुरू करण्यात यावी, अशी लोकांची मागणी आहे. कारण एवढे करूनही हेलपाटे मारूनदेखील नेवरी येथे डॉक्टर सापडतील, याची खात्री नाही. मध्यंतरी वरील गावातील पाणी खराब झाल्यावर लोकांनी कडेगाव ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. तेव्हा त्यांनी आमचा यांच्याशी संबंध नाही, आपण नेवरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करावा, असे सांगितले.  सध्या डेंग्यूची साथ सर्वत्र सुरू झाली आहे. त्यामुळे लोकांत घबराट निर्माण झाली आहे. कडेगावसारख्या तालुक्याच्या गावाला आरोग्यासाठी जर नेवरीला जावे लागत असेल तर, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी नसावी, असे म्हणावे लागेल. याबाबत नेवरी येथील आरोग्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मिटिंगला गेले, असे उत्तर मिळाले. कडेगाव पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी खुर्द व जाधव यांनी सांगितले की, कडेगाव येथे ग्रामीण रुग्णालय झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेवरी येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे कडेगावसह १५ गावांचा आरोग्य कारभार नेवरी आरोग्य केंद्रामार्फत केला जातो. लोकांच्या हितासाठी आरोग्य सेवा कडेगाव किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सुरू करावी, असा प्रस्ताव आम्ही शासनाला दिला होता. त्याप्रमाणे वांगी-देवराष्ट्रे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. परंतु कडेगावबाबत कोणताही निर्णय कळवण्यात आला नाही. त्यामुळे सध्या या गावची आरोग्य सेवा नेवरी प्रा. आ. केंद्रामार्फत पुरवण्यात येते. त्यासाठी खास करून आरोग्यसेविका नेमण्यात आल्या आहेत. त्यामार्फत वरील गावांच्या आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत. वस्तुत: कडेगाव प्रा. आ. केंद्र बंद करण्याबाबत त्यावेळी ग्रामस्थांनी विरोध केला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आरोग्य खात्याच्या या अजब कारभाराबाबत लोकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे काळाची गरज आहे. रुग्णांची गैरसोयकडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित शाळगाव, कडेगाव, शिवाजीनगर, विहापूर, रेणुशेवाडी, सोहोली, चिखली, कडेपूर, हिंगणगाव बु।।, तडसर, नेर्ली, अपशिंगे, कोतवडे या गावांचा समावेश होता. मात्र ते आता नेवरी येथे सुरू करण्यात आल्याने या गावातील रुग्णांसह नातेवाइकांना विनाकारण १५ ते २0 कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे.