शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सांगली जिल्ह्यातील गायरानमधील ११४६८ बांधकामांवर पडणार हातोडा, मास्टर प्लॅन तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 12:29 IST

पहिल्या टप्प्यामध्ये गायरान जमिनीवर अतिक्रमणे हटविण्यासाठी संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत

सांगली : जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील गायरान जमिनीवर ११ हजार ४६८ बांधकामे झाली असून, यावर हातोडा टाकण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेकडून पूर्ण नियोजन झाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये गायरान जमिनीवर अतिक्रमणे हटविण्यासाठी संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत. यातूनही अतिक्रमणे हटविली नाही तर विशेष मोहीम राबवून अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.सर्व शासकीय व गायरान जमिनीवर असलेल्या अतिक्रमणाबाबत कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठित केली असून, त्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, नगर परिषद, नगरपंचायत मुख्याधिकारी व उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून २७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर असा कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला. त्यानुसार जिल्ह्यात गायरान जमिनीमध्ये ११ हजार ४६८ बांधकामे झाली आहेत. जवळपास १० हजार ५१ हेक्टर क्षेत्रावर बांधकामे झाले असून ही हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शासकीय ३९५.४७ हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणेही हटविण्यात येणार असून, जमिनी ताब्यात घेण्यात येणार आहेत.

३१ डिसेंबरपूर्वी अतिक्रमणे हटविणार : राजा दयानिधीसर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शासकीय व गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ ची डेडलाइन दिली. यासाठी कालबद्ध नियोजन व आराखडा निश्चित केला. नेमकी जमीन अन् अतिक्रमणे किती याची अद्ययावत माहिती जिल्हा प्रशासनाने घेण्यास सुरुवात केली आहे. माहिती संकलन सुरू असून, त्यानंतरच अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

जिल्ह्यात अशी आहेत अतिक्रमणेतालुका           गायरान जमिनीतील बांधकामेमिरज                ३५३६तासगाव             २३८७क. महांकाळ       १५५०जत                  ५३३खानापूर             ४५४आटपाडी           २४७कडेगाव             १०९३पलूस                १८८वाळवा              १३६३शिराळा             १९७एकूण               ११४६८गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमितीकरण करा : उमेश देशमुखगायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमितीकरणासाठी १९९१ मध्ये कर्मवीवर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त तत्कालीन राज्य शासनाने नियमितीकरण केले होते. त्यानुसार सध्याची गायरान जमिनीवरील अतिक्रमणे शासनाने नियमितीकरण केली पाहिजेत. एकाही अतिक्रमणास प्रशासनाने हात लावू नये, अशी मागणी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगली