शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सांगलीत तरुणाचा पूर्ववैमनस्यातून गुप्तीने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 12:46 IST

विश्रामबाग येथे सह्याद्रीनगमध्ये खोजा कॉलनीत राहणाऱ्या सरफराज युसूफ इराणी (वय २६) या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून गुप्तीने भोसकून खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी फिरोज इराणी व त्याच्या मुलाचे नाव निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्देफिरोज इराणी व त्याच्या मुलाचे नाव निष्पन्न फिरोज आणि इराणी समाजात गेल्या अनेक वर्षापासून वाद वादाचे पर्यवसान मारामारीत दोन महिन्यात सांगली शहर व परिसरात सहा खून

सांगली , दि. २१ : विश्रामबाग येथे सह्याद्रीनगमध्ये खोजा कॉलनीत राहणाऱ्या सरफराज युसूफ इराणी (वय २६) या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून गुप्तीने भोसकून खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी फिरोज इराणी व त्याच्या मुलाचे नाव निष्पन्न झाले आहे.

इराणी समाजातील काही लोक पूर्वी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारुन लंपास करायचे. संशयित फिरोज हा समाजातील दागिने चोरणाऱ्या लोकांची नावे पोलिसांना सांगतो, असा समाजाला संशय होता. यावरुन फिरोज आणि समाजात गेल्या अनेक वर्षापासून वाद आहे.

या वादातून फिरोजने इराणी वस्तीतून कुटूंबासह स्थलांतर केले होेते. तो खोजा कॉलनीत राहत होता. तरीही त्यांच्यातील वाद मिटला नाही. फिरोज व त्याच्या कुटूंबास कोणत्याही कार्यक्रमास बोलाविले जात नसे.

शुक्रवारी जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील समाजातील एकाचे निधन झाले होते. त्याच्यावर कुपवाड येथील दफन भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी फिरोज मुलासह गेला होता. तिथे समाजातील लोकांनी तू का आला आहेस, असे म्हणून वाद घातला. एकमेकांना बघून घेण्याची धमकी देण्यात आली.

अंत्यसंस्कार झाल्यानंतर फिरोज मुलासह घरी आला. त्यावेळी मृत सरफराज इराणी व समाजातील काही लोक जाब विचारण्यासाठी फिरोजच्या घरी गेले. तिथे त्यांच्यात पुन्हा जोरदार वाद झाला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले.

फिरोजच्या मुलाने गुप्तीने केलेल्या हल्ल्यात सरफराज जागीच मरण पावला. गुप्तीचा वार सरफराजच्या फुफ्फूसात घुसल्याने प्रचड रक्तस्त्राव झाला होता. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होता. खुनामागील निश्चित कारण शोधले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सांगलीत दोन महिन्यात सहा खूनगेल्या दोन महिन्यात शहर व परिसरात सहा खून झाले आहेत. संजयनगर पोलिस ठाण्याच्याहद्दीत तीन, विश्रामबागला एक, सांगली ग्रामीणच्याहद्दीत तीन असे खून झाले आहेत. यातील सर्व खून पूर्ववैमनस्यातूनच झाले आहेत.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा