शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

स्वच्छता अभियानातून गावागावांत विकासाची स्पर्धा व्हावी, पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केलं आवाहन

By अशोक डोंबाळे | Updated: October 13, 2023 18:58 IST

आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेचे बक्षीस वितरण

सांगली : केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना राबविण्यात गावं कमी पडणार नाहीत. स्वच्छता अभियानामुळे गावं सुधारली. याशिवाय अनेक फायदे झाले आहेत. गावे स्वच्छ आणि निटनेटकी झाली पाहिजेत, ही भूमिका घेवून जिल्ह्यातील गावांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला पाहिजे. गावच्या विकासासाठी गावागावांत स्पर्धा निर्माण करावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले.जिल्हा परिषदेत आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार प्राप्त २० गावांचा सन्मान पालकमंत्री डॉ. खाडे यांच्याहस्ते केला. याप्रसंगी खा. संजय पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, आ. सुमनताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होते.खाडे म्हणाले, अभियानाच्या माध्यमातून गावांची ओळख बदलत चालली आहे. यापूर्वी ज्या गावांना नावे ठेवली, त्यांनी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटविला. तिर्थक्षेत्र विकास, रस्ते दुरुस्तीसाठी निधी मिळतो. गावातील मतभेद विसरुन शासनाने दिलेल्या पैशाचा वापर ग्रामपंचायतींकडून योग्य कामासाठी खर्च झाला पाहिजे.आ. नाईक म्हणाले, ग्रामस्वराज्यमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल. ग्रामीण भागातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी पुढे आले. त्यामध्ये स्वर्गीय आर. आर. आबा, शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, खा. संजय पाटील यांना संधी मिळाली. अभियानाव्दारे गावांतील वाद विसरुन कामे करीत आहेत.आ. सुमनताई पाटील म्हणाल्या, यापूर्वी अंजनीपुरते मर्यादित असलेले आबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचे पोहोचले. आबांनी सुरु केलेले अभियान देशात पोहोचले. अभियानामुळे गावात असलेले तंटे विसरुन लोक एकत्र आले, ही अभिमानाची बाब आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे म्हणाल्या, जिल्ह्यीतील गाव ठरवितात आणि त्याला ग्रामसेवकाने जोड दिल्यास विकासाला बळ मिळते. त्याव्दारे आदर्श गावे तयार करण्याचे काम सुरु आहे.उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, कार्यकारी अभियंता भारती बिराजे, संजय येवले, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांच्यासह सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक उपस्थित होते.गावांत केवळ निवडणुकीत स्पर्धा ठेवा : संजय पाटीलजेवढी लहान गाव, तेवढी निवडणुकीत चुरस निर्माण होते. परंतु निवडणुकीनंतर मतभेद विसरुन एकत्र काम करावे. गावांतील स्पर्धा निवडणुकीपुरती मर्यादित ठेवा, असे आवाहन खा. संजय पाटील यांनी केले.

जिल्ह्यातील १६ गावांचा गौरव२१-२२ यावर्षी नांगोळे (ता. कवठेमहांकाळ), कर्नाळ (ता. मिरज), वांगी (ता. कडेगाव), ढवळेश्वर (ता. खानापूर), शिरगाव (ता. तासगाव), सांडगेवाडी (ता. पलूस), फाळकेवाडी (ता. वाळवा). तसेच सुंदर गाव पुरस्कार : २२-२३ यावर्षी बोरगाव (ता. कवठेमहांकाळ), पद्माळे (ता. मिरज), नागेवाडी (ता. खानापूर), पाडळीवाडी (ता. शिराळा), हिवतड (ता. आटपाडी), कौलगे (ता. तासगाव), खंडोबाचीवाडी (ता. पलूस), रावळगुंडवाडी (ता. जत), मिरजवाडी (ता. वाळवा). जिल्हा सुंदर गाव पुरस्कार : मिरजवाडी आणि बोरगाव (विभागून) या गावांतील सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांनी सन्मान स्वीकारला.

टॅग्स :Sangliसांगली