शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

शुभवार्ता! दुष्काळी जत तालुक्यावर पावसाची कृपादृष्टी, भूजल पातळीत झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 12:37 IST

अशोक डोंबाळे सांगली : टँकरचा तालुका ही ओळख मिटवीत दुष्काळी जत तालुक्यातील भूजल पातळीत १.४५ मीटरने वाढ झाली आहे. ...

अशोक डोंबाळे

सांगली : टँकरचा तालुका ही ओळख मिटवीत दुष्काळी जत तालुक्यातील भूजल पातळीत १.४५ मीटरने वाढ झाली आहे. यंदा पावसाची जत तालुक्यावर कृपादृष्टी राहिल्यामुळे दुष्काळाचे सावट मिटले आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यांपैकी सहा तालुक्यांची पाणीपातळी वाढल्याचे भूजल सर्वेक्षणच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. वाळवा, शिराळा येथे सर्वाधिक पाऊस होऊनही भूजल पातळी घटली आहे.

जिल्ह्याची सप्टेंबरमधील पाच वर्षांची सरासरी भूजल पातळी ३.७९ मीटर आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये ०.३८ मीटरने वाढून ती ३.४२ मीटरवर स्थिर झाली. जत, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस या सहा तालुक्यांत भूजल पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील ८६ निरीक्षण विहिरींतील भूजल पातळीत सरासरीपेक्षा वाढ झाली आहे.

जत तालुक्यात सर्वाधिक भूजल पातळी १.४५ मीटरने वाढली आहे. सर्वांत कमी ०.०७ मीटरची वाढ खानापूर तालुक्यात नोंदविली आहे. भूजल पातळी १.०८ मीटरने वाढून कवठेमहांकाळ तालुका दुसऱ्या स्थानावर आहे, तर ०.९२ मीटरने भूजल पातळी वाढून तासगाव तालुका तिसऱ्या स्थानावर आहे.

परतीच्या पावसाने काही तालुक्यांत ढगफुटीसारखा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, रब्बी पिकांना या भूजल पातळी वाढल्याचा फायदा होणार आहे. गहू, ज्वारी, हरभऱ्यासह अन्य पिके जोमात येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे, तसेच टँकरवर अवलंबून असणारा जत तालुका टँकरमुक्त राहील, अशी अपेक्षा आहे.

मिरज तालुक्यातील -०.१९ मीटर, वाळवा -०.३२, शिराळा -०.२३ आणि कडेगाव तालुक्यातील भूजल पातळी -०.१७ मीटरने घटली आहे. वास्तविक पाहता या चारही तालुक्यांत सरासरी ५०० मीटरपेक्षा जास्त पाऊस होत असूनही भूजल पातळी घटल्यामुळे चिंतेची बाब आहे.

जिल्ह्याची भूजल पातळी (प्रति मीटर)

तालुकापातळी वाढ
मिरज -०.१९
जत१.४५
खानापूर ०.०७
वाळवा -०३२
तासगाव ०.९२
शिराळा -०.२३
आटपाडी०.८३
क.महांकाळ १.०८
पलूस ०.३४
कडेगाव- ०.१७
एकूण०.३८

वर्षातून चार वेळा नोंदी

पाणी पातळीतील वाढ किंवा झालेली घट यात अचुकता येण्यासाठी जिल्ह्यातील विहिरींची संख्या दुप्पट केली आहे. त्यांचे मोजमामही तीन वर्षांपासून सुरू आहे. पाच वर्षे नियमित मोजणी झाल्यानंतर त्या नोंदींचा विचार केला जाईल. त्यामुळे अचूकता वाढणार आहे. वर्षातून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि सप्टेंबरमध्ये पाणीपातळीचे मोजमाप केले जाते.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटWaterपाणी