शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

शुभवार्ता! दुष्काळी जत तालुक्यावर पावसाची कृपादृष्टी, भूजल पातळीत झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 12:37 IST

अशोक डोंबाळे सांगली : टँकरचा तालुका ही ओळख मिटवीत दुष्काळी जत तालुक्यातील भूजल पातळीत १.४५ मीटरने वाढ झाली आहे. ...

अशोक डोंबाळे

सांगली : टँकरचा तालुका ही ओळख मिटवीत दुष्काळी जत तालुक्यातील भूजल पातळीत १.४५ मीटरने वाढ झाली आहे. यंदा पावसाची जत तालुक्यावर कृपादृष्टी राहिल्यामुळे दुष्काळाचे सावट मिटले आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यांपैकी सहा तालुक्यांची पाणीपातळी वाढल्याचे भूजल सर्वेक्षणच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. वाळवा, शिराळा येथे सर्वाधिक पाऊस होऊनही भूजल पातळी घटली आहे.

जिल्ह्याची सप्टेंबरमधील पाच वर्षांची सरासरी भूजल पातळी ३.७९ मीटर आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये ०.३८ मीटरने वाढून ती ३.४२ मीटरवर स्थिर झाली. जत, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस या सहा तालुक्यांत भूजल पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील ८६ निरीक्षण विहिरींतील भूजल पातळीत सरासरीपेक्षा वाढ झाली आहे.

जत तालुक्यात सर्वाधिक भूजल पातळी १.४५ मीटरने वाढली आहे. सर्वांत कमी ०.०७ मीटरची वाढ खानापूर तालुक्यात नोंदविली आहे. भूजल पातळी १.०८ मीटरने वाढून कवठेमहांकाळ तालुका दुसऱ्या स्थानावर आहे, तर ०.९२ मीटरने भूजल पातळी वाढून तासगाव तालुका तिसऱ्या स्थानावर आहे.

परतीच्या पावसाने काही तालुक्यांत ढगफुटीसारखा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, रब्बी पिकांना या भूजल पातळी वाढल्याचा फायदा होणार आहे. गहू, ज्वारी, हरभऱ्यासह अन्य पिके जोमात येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे, तसेच टँकरवर अवलंबून असणारा जत तालुका टँकरमुक्त राहील, अशी अपेक्षा आहे.

मिरज तालुक्यातील -०.१९ मीटर, वाळवा -०.३२, शिराळा -०.२३ आणि कडेगाव तालुक्यातील भूजल पातळी -०.१७ मीटरने घटली आहे. वास्तविक पाहता या चारही तालुक्यांत सरासरी ५०० मीटरपेक्षा जास्त पाऊस होत असूनही भूजल पातळी घटल्यामुळे चिंतेची बाब आहे.

जिल्ह्याची भूजल पातळी (प्रति मीटर)

तालुकापातळी वाढ
मिरज -०.१९
जत१.४५
खानापूर ०.०७
वाळवा -०३२
तासगाव ०.९२
शिराळा -०.२३
आटपाडी०.८३
क.महांकाळ १.०८
पलूस ०.३४
कडेगाव- ०.१७
एकूण०.३८

वर्षातून चार वेळा नोंदी

पाणी पातळीतील वाढ किंवा झालेली घट यात अचुकता येण्यासाठी जिल्ह्यातील विहिरींची संख्या दुप्पट केली आहे. त्यांचे मोजमामही तीन वर्षांपासून सुरू आहे. पाच वर्षे नियमित मोजणी झाल्यानंतर त्या नोंदींचा विचार केला जाईल. त्यामुळे अचूकता वाढणार आहे. वर्षातून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि सप्टेंबरमध्ये पाणीपातळीचे मोजमाप केले जाते.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटWaterपाणी