शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शुभवार्ता! दुष्काळी जत तालुक्यावर पावसाची कृपादृष्टी, भूजल पातळीत झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 12:37 IST

अशोक डोंबाळे सांगली : टँकरचा तालुका ही ओळख मिटवीत दुष्काळी जत तालुक्यातील भूजल पातळीत १.४५ मीटरने वाढ झाली आहे. ...

अशोक डोंबाळे

सांगली : टँकरचा तालुका ही ओळख मिटवीत दुष्काळी जत तालुक्यातील भूजल पातळीत १.४५ मीटरने वाढ झाली आहे. यंदा पावसाची जत तालुक्यावर कृपादृष्टी राहिल्यामुळे दुष्काळाचे सावट मिटले आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यांपैकी सहा तालुक्यांची पाणीपातळी वाढल्याचे भूजल सर्वेक्षणच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. वाळवा, शिराळा येथे सर्वाधिक पाऊस होऊनही भूजल पातळी घटली आहे.

जिल्ह्याची सप्टेंबरमधील पाच वर्षांची सरासरी भूजल पातळी ३.७९ मीटर आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये ०.३८ मीटरने वाढून ती ३.४२ मीटरवर स्थिर झाली. जत, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस या सहा तालुक्यांत भूजल पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील ८६ निरीक्षण विहिरींतील भूजल पातळीत सरासरीपेक्षा वाढ झाली आहे.

जत तालुक्यात सर्वाधिक भूजल पातळी १.४५ मीटरने वाढली आहे. सर्वांत कमी ०.०७ मीटरची वाढ खानापूर तालुक्यात नोंदविली आहे. भूजल पातळी १.०८ मीटरने वाढून कवठेमहांकाळ तालुका दुसऱ्या स्थानावर आहे, तर ०.९२ मीटरने भूजल पातळी वाढून तासगाव तालुका तिसऱ्या स्थानावर आहे.

परतीच्या पावसाने काही तालुक्यांत ढगफुटीसारखा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, रब्बी पिकांना या भूजल पातळी वाढल्याचा फायदा होणार आहे. गहू, ज्वारी, हरभऱ्यासह अन्य पिके जोमात येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे, तसेच टँकरवर अवलंबून असणारा जत तालुका टँकरमुक्त राहील, अशी अपेक्षा आहे.

मिरज तालुक्यातील -०.१९ मीटर, वाळवा -०.३२, शिराळा -०.२३ आणि कडेगाव तालुक्यातील भूजल पातळी -०.१७ मीटरने घटली आहे. वास्तविक पाहता या चारही तालुक्यांत सरासरी ५०० मीटरपेक्षा जास्त पाऊस होत असूनही भूजल पातळी घटल्यामुळे चिंतेची बाब आहे.

जिल्ह्याची भूजल पातळी (प्रति मीटर)

तालुकापातळी वाढ
मिरज -०.१९
जत१.४५
खानापूर ०.०७
वाळवा -०३२
तासगाव ०.९२
शिराळा -०.२३
आटपाडी०.८३
क.महांकाळ १.०८
पलूस ०.३४
कडेगाव- ०.१७
एकूण०.३८

वर्षातून चार वेळा नोंदी

पाणी पातळीतील वाढ किंवा झालेली घट यात अचुकता येण्यासाठी जिल्ह्यातील विहिरींची संख्या दुप्पट केली आहे. त्यांचे मोजमामही तीन वर्षांपासून सुरू आहे. पाच वर्षे नियमित मोजणी झाल्यानंतर त्या नोंदींचा विचार केला जाईल. त्यामुळे अचूकता वाढणार आहे. वर्षातून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि सप्टेंबरमध्ये पाणीपातळीचे मोजमाप केले जाते.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटWaterपाणी