शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

किराणा माल संपला, भाजीपाला परवडत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST

इस्लामपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमुळे इस्लामपूर शहरातील हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची होरपळ होत ...

इस्लामपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमुळे इस्लामपूर शहरातील हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची होरपळ होत आहे. प्रत्येकाने कुवतीनुसार घेऊन ठेवलेला किराणा माल संपल्याने फरफट होऊ लागली आहे, तर भाजीपालाही मिळत नसल्याचे चित्र आहे.

गेल्या मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यावर शहरासह परिसरात अनेक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरावर भीतीचे साम्राज्य दाटले होते. त्यावेळी या साथीच्या भीतीने नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले. त्यावेळी काही लोकप्रतिनिधी, समाजसेवक, युवक मंडळे आणि सामाजिक संस्था मदत करण्यात आघाडीवर होत्या. सामान्य कुटुंबांसह मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना त्या मदतीच्या बळावर काळ व्यतीत करता आला.

आता पुन्हा दुसऱ्या लाटेने तोंडचे पाणी पळवले आहे. या साथीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात आठ दिवसांपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे कायद्याच्या धाकापोटी व्यापाऱ्यांनी दारे लावून घेतली आहेत. या परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या आणि मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबांची परवड होऊ लागली आहे. कोणाचा शिधा संपला, तर अनेकांना भाजीपाला घेणे दुरापास्त होत आहे. त्यातच या दुसऱ्या लाटेत मदतीचे हात आखडते असल्याने अनेक कुटुंबे जगण्यासाठी हतबल झाली आहेत.

चौकट

दातृत्वाचा हात गेला कोठे?

शहरामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी राजकीय पुढाऱ्यांसह समाजाच्या सर्व स्तरांतून सामान्य कुटुंबांसाठी मदतीचा मोठा ओघ सुरू होता. कोणी अन्नदान केले, तर कोणी महिनाभर पुुरेल इतका शिधा दिला. मात्र, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही सर्व मदत गायब झाल्याचे चित्र आहे.