शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

नागनाथअण्णांना अभिवादन

By admin | Updated: July 15, 2016 23:57 IST

वाळव्यात विविध कार्यक्रम : शैक्षणिक संस्थांची प्रभातफेरी, वृक्षारोपण

वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या ९४ व्या जयंतीदिनी शुक्रवारी सकाळी आठ वाजता त्यांचे पुत्र आणि हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी साखर कारखाना कार्यस्थळी समाधीस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. सकाळी सात वाजता किसान शिक्षण संस्थेच्या हुतात्मा किसन अहिर विद्यालय, जिजामाता विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा नं. १, २ व ३, हुतात्मा किसन अहिर प्राथमिक विद्यालय, हुतात्मा नर्सिंग कॉलेज, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी सैनिक व निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घोषणा देत प्रभातफेरी काढली. वैभव नायकवडी यांच्याहस्ते प्रभात फेरीस प्रारंभ करण्यात आला. वाळव्याबरोबरच शिरगाव (ता. वाळवा), नागठाणे (ता. पलूस) येथीलही सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली.शिरगाव येथे सिद्धेश्वर मंदिर परिसर येथे माजी सरपंच राजाराम शिंदे, तानाजी हवलदार, कारखाना संचालक एकनाथ वाघमारे, बबन हवलदार, बाळासाहेब माने यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कारखाना कार्यस्थळावरील वृक्षारोपणानंतर प्रभातफेरी समाधीस्थळी आल्यानंतर उपस्थित सर्वांना हुतात्मा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. साखर शाळेतील क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यात आले. हुतात्मा बॅँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, सरपंच गौरव नायकवडी, हुतात्मा कारखाना संचालक सुरेश होरे, बाळासाहेब तांदळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस, डी. एम. अनुसे, शेती अधिकारी दीपक पाटील, दूध संघाचे उपाध्यक्ष भगवानभाऊ पाटील, संचालक बाळासाहेब पाटील, संजय होरे, हुतात्मा बझारचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, उपाध्यक्ष दिनकर बाबर, मारुती चव्हाण, उपाध्यक्ष महंमद चाऊस, रमेश आचरे, जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके, सावकर कदम, पांडुरंग अहिर, पोपट अहिर, अजित वाजे, जयवंत अहिर, नंदू पाटील, उपसरपंच अपर्णा साळुंखे, उमेश घोरपडे, बाजीराव नायकवडी, प्रा. बाळासाहेब नायकवडी यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)मान्यवरांकडून वृक्षारोपणसकाळी नऊ वाजता हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या डिस्टिलरी प्लॅँट परिसरात अध्यक्ष नायकवडी व मान्यवरांच्याहस्ते आंबा, नारळ, चिक्कू आदी फळरोपांचे रोपण करण्यात आले. शिरगाव येथे सिद्धेश्वर मंदिर परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले.