शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

सांगली जिल्ह्यातील वित्तीय संस्थांवर एनपीए वाढीचे मोठे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 17:08 IST

कृषी पतसंस्था, सोसायट्या यांचीही वित्तीय कसरत सुरू झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांत इतकी आर्थिक अडचण कधी निर्माण झाली नसल्याचे मत जिल्ह्यातील बॅँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने काही दिवसांपूर्वीच याबाबतचा धोका स्पष्ट केला होता.

अविनाश कोळी ।

सांगली : जिल्ह्यातील बहुतांश वित्तीय संस्थांवर एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेटस्) वाढीचे संकट घोंगावत आहे. महापूर, अतिवृष्टी आणि त्याच्या माध्यमातून बिघडलेल्या अर्थचक्रात या संस्था फसल्या आहेत. जिल्हा बँकांसह सहकारी बँका, पतसंस्थांसमोर कर्जवसुलीचे मोठे आव्हान निर्माण झाल्याने एनपीए खात्यांसाठी एक वर्षाच्या सवलतीची मागणी केली जात आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने काही दिवसांपूर्वीच याबाबतचा धोका स्पष्ट केला होता. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात विस्तार असलेली व कृषीपूरक कर्जपुरवठा करणारी सर्वात मोठी बॅँक म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिले जाते. या बँकेसमोरही एनपीएचे भूत नाचू लागले आहे. नैसर्गिक संकटात भरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करणे अडचणीचे बनले आहे. त्याचबरोबर कर्जमाफीच्या अपेक्षेनेही अनेकांनी कर्जाचे हप्ते भरले बंद केले आहे. त्यामुळे बँकेकडील अनेक खाती एनपीएमध्ये गेली आहेत. बिगरशेती कर्जांची वसुली करतानाही बिघडलेल्या अर्थकारणाचा फटका बँकेला बसत आहे.

जिल्हा बँकेप्रमाणे जिल्ह्यातील पतसंस्थाही अडचणीत आल्या आहेत. पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातूनही एनपीए खात्यांबाबत सवलत मिळावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. नुकत्याच झालेल्या त्यांच्या मेळाव्यात याबाबतच्या मागणीचा ठराव करण्यात आला. कृषी पतसंस्था, सोसायट्या यांचीही वित्तीय कसरत सुरू झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांत इतकी आर्थिक अडचण कधी निर्माण झाली नसल्याचे मत जिल्ह्यातील बॅँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅँक, सहकारी बॅँका, पतसंस्था यांचे जिल्ह्याच्या अर्थकारणातील योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी या बिघडलेल्या अर्थकारणाचे चित्र स्पष्ट करणाºया आहेत. त्यामुळे वित्तीय संस्थांची यातून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. जिल्हा बॅँकेचा एनपीए वाढला तर, त्यांना मिळणाºया वित्तपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

टॅग्स :bankबँकMONEYपैसाfloodपूर