शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष बागायतदारांचे गाव आले अचानक क्राईम पटलावर...

By admin | Updated: May 11, 2016 00:44 IST

सिध्दनाथमध्ये दुहेरी खून : किरकोळ कारणाने खुन्नस, गाव हादरले, सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वांच्याच पुढाकाराची गरज

गजानन पाटील-- संख -जत तालुक्यातील सिध्दनाथ येथे पूर्ववैमनस्यातून, राजकीय हेव्या-दाव्यातून दोन सख्ख्या चुलत भावांचा खून झाल्याने नाती-गोती विसरून माणूसपण हरवत चालले की काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन सख्ख्या चुलत भावांच्या खुनाने द्राक्ष बागायतदारांचे गाव प्रथमच क्राईम पटलावर आले आहे. मुळात भक्तिमार्गाचे, शांत असणारे गाव या घटनेने चर्चेत आले आहे. तालुक्याच्या पूर्वेला २८ कि. मी. अंतरावर असणारे सिध्दनाथ हे गाव बागायती गाव म्हणून ओळखले जाते. गावालगत तलाव आहे. बोर नदी गावाजवळून वाहते. पाण्याचे बऱ्यापैकी स्त्रोत असल्याने द्राक्ष, भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गाव बेदाणा निर्मितीमध्ये अग्रेसर आहे. येथे चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार केला जातो. गेल्यावर्षी येथील बेदाण्याला उच्चांकी दर मिळाला होता.मुळात येथील माणसे कष्टाळू आहेत. सिध्देश्वर मंदिर आहे. शाकाहारी गाव आहे. गावात कधीही खुनासारखी घटना घडलेली नाही. किरकोळ वादावादी, मारामारी घडली आहे. दुहेरी खुनाने हे गाव तालुक्यात चर्चेत आले आहे.गावापासून १ कि. मी. अंतरावर पश्चिमेला माने वस्तीवर मारुती माने व अण्णाप्पा माने हे सख्खे भाऊ राहत होते. मारुती यांची द्राक्षबाग आहे, तर अण्णाप्पा यांची नवीन लागणीची द्राक्षबाग व पशुपालनाचा व्यवसाय आहे. शेताजवळ तलाव असल्यामुळे उत्पादन बऱ्यापैकी आहे. याच आर्थिक सुबत्तेमधून समाजात, गावात मी मोठा की तू, अशा हेव्यादाव्यातून दरी निर्माण झाली. महिलांची भांडणे तसेच राजकीय वाद याही गोष्टी वादाला करणीभूत ठरल्या. मग हा वाद एकमेकांच्या जिवावर उठला. सध्या घरातील कारभार हा तरुण मुलांच्या हातात आला. तरुणांना कोणाचेच ऐकून घेण्याची सवय नसल्याने सामाजिक भान, भाव-भावकीतील कोणत्याही गोष्टीमध्ये प्रतिष्ठेला धक्का लागला जातो. याचाच प्रत्यय सिध्दनाथमधील दुहेरी खुनामध्ये दिसतो. दोन्ही घरांमध्ये कारभार करणारी तरुण मुलेच आहेत. अण्णाप्पाची राजू, संजू व गजानन ही मुले, तर मारूतीची दऱ्याप्पा, सुखदेव, नवनाथ, पुतण्या सुदेश ही मुले यांच्या हातात घरातील सर्व सूत्रे होती. दोन्ही घरातील तरूण मुले सामाजात, गावात मी मोठा, मलाच प्रतिष्ठा या नावाखाली सर्व नातीगोती विसरून एकमेकांचा द्वेष, मत्सर करु लागली. याअगोदर माने कुटुंबीय सामंजस्याने प्रश्न सोडविणारे होते. परंतु तरूण मुलांच्या आततायीपणामुळे दोघांचा विनाकरण बळी गेला आहे.दोन्ही कुटुंबे संकटातया घटनेमुळे दोन्ही कुटुंबातील कर्ती माणसे गेली आहेत, तर खुनाच्या आरोपाखाली सर्व तरुण मुले तुरुंगात जाणार आहेत. फक्त बायकाच शिल्लक राहणार आहेत. त्यांच्यावरच म्हातारी माणसे, मुलेबाळे यांचा सांभाळ करण्याची वेळ आली आहे. पुरूष मंडळी तुरुंगात गेल्याने कुटुंबे उघड्यावर पडणार आहेत.पुढाकाराची गरज...गावामध्ये अशाप्रकारचे वाद-विवाद, भांडणतंटे सामंजस्याने मिटवून कर्तीसवरती मंडळी, तसेच गावपुढाऱ्याने, सामाजिक कार्यकर्त्यांनी ते सोडविण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी कोणतेही राजकारण न करता समाजातील एकोपा राखण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. समाजातील वाद, प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सर्व समाजाने पुढे येण्याची गरज आहे. सामंजस्याने प्रश्न सोडविण्याची गरज आहे. घरातून संस्कारांचे शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे.-कृष्णा चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, दरीबडची