शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
5
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
6
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
7
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
8
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
9
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
10
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
11
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
12
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
13
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
14
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
15
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
16
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
17
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
18
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
19
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
20
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...

जालिहाळमध्ये ग्रामपंचायत बिनविरोधचा ‘सुवर्णमहोत्सव’

By admin | Updated: August 1, 2015 00:22 IST

परंपरा जपली : सलग दहावी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध; राजकारणापेक्षा विकासाला महत्त्व

संख : गावाचा विकास करण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून ५० वर्षांची परंपरा जपत ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून जत तालुक्यातील जालिहाळ खुर्दच्या ग्रामस्थांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. राजकारणासाठी राजकारण, तर विकासासाठी ऐक्य जपत सलग १० वी निवडणूक बिनविरोध झाली आहे. जालिहाळ खुर्द कर्नाटक सीमेलगत जतपासून पूर्वेकडे २८ कि.मी. अंतरावरील गाव. लोकसंख्या अवघी १०४१. द्राक्षे, डाळिंब, बागायतदारांचे सधन गाव, बेदाणा उत्पादनात आघाडीवर. ग्रामपंचायतीची स्थापना १० नोव्हेंबर १९६५ रोजी झाली. सुरुवातीपासून गावात एकी असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक होण्याची वेळच आली नाही. विरोध म्हणजे गावामध्ये भाजप, काँग्रेस पक्षाचे गट कार्यरत आहेत. ग्रामपंचायत, विकास सोसायटीची निवडणूक वगळता बाकीच्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीने भाग घेतला जातो. १९९० पर्यंत गावाचे नेतृत्व श्रीमंत पाटील, बाबूराव चव्हाण, रामजी पाटील, निवृत्ती सूर्यवंशी, आप्पा शिंदे, सिदगोंडा पाटील या जाणत्या नेत्यांकडे होते. त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्यांच्या कालावधित गावाचा विकास झाला. गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून प्राथमिक मराठी शाळेची इमारत उभारली आहे. १९९० नंतर गावाचे नेतृत्व तरुण पिढीकडे आले. माजी सरपंच कामाण्णा पाटील, माजी अध्यक्ष राजू डफळे सरकार, केरुबा बिराजदार, कुंडलिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कारभार चालतो. ग्रामपंचायत निवडणूक, विकास सोसायटी निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रथम गावामध्ये दवंडी दिली जाते. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन चर्चा करतात. पंचांची निवड करतात. तरुण, सुशिक्षित, काम करण्याची आवड हे निकष ठेवून निवड केली जाते. लगेच त्याचवेळी सरपंच, उपसरपंचांची निवड केली जाते. कोणताही राजकीय गट यामध्ये राजकारण आणत नाही. तंटामुक्ती पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार, इको व्हिलेज, असे पुरस्कार गावाला मिळाले आहेत. (वार्ताहर)उमदी.. पोलीस हद्दीतील शांतताप्रिय गावउमदी हे पोलीस हद्दीतील शेवटचे गाव आहे. गावामध्ये पंचायत भरवून न्यायनिवाडा केला जातो. आतापर्यंत एकही वाद न्यायालयापर्यंत गेलेला नाही. गावातील खटला नोंदीचे रजिस्टर कोरेच आहे. निवडणुकीवेळी गावात पोलीस येतात. गावात एकच गणपती बसविला जातो.महिलांना संधीपुरुषांबरोबर महिलांनाही संधी देण्यात आली आहे. यापूर्वी उपसरपंच म्हणून गंगवा कोळी, तुळसाबाई करपे यांनी काम पाहिले आहे. पहिल्या महिला सरपंच म्हणून यल्लव्वा प्रल्हाद पाटील यांनी काम पाहिले आहे. यावेळी सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असून इतिहासात प्रथमच शांता दादा जावीर यांना संधी मिळणार आहे..लोकांमध्ये द्वेष, राजकीय वैमनस्य राहत नाही. विकासामध्ये राजकारण होत नाही. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत.- कामाण्णा पाटील, सरपंच५५ वर्षे निवडणूक बिनविरोध झाल्याने गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे. नागरी सुविधांचे प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे. - राजू डफळे सरकार, उपसरपंच