शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भित्तीचित्रांमधून विद्यार्थ्यांनी केले समाजप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 16:13 IST

राजवाडा चौकातील भारती विद्यापीठाच्या कुंपण भिंतीला समाजप्रबोधनाचे साधन बनविताना विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पकता व कला यांचे अनोखे दर्शन घडविले. विविध सामाजिक विषयांवरील चित्रांनी भिंतींना सजीव केले असून, ही चित्रे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्देभित्तीचित्रांमधून विद्यार्थ्यांनी केले समाजप्रबोधनअनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक, नागरिकांची गर्दी

सांगली : राजवाडा चौकातील भारती विद्यापीठाच्या कुंपण भिंतीला समाजप्रबोधनाचे साधन बनविताना विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पकता व कला यांचे अनोखे दर्शन घडविले. विविध सामाजिक विषयांवरील चित्रांनी भिंतींना सजीव केले असून, ही चित्रे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.सांगलीच्या भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी भित्तीचित्र स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकलेचे फारसे ज्ञान नसले तरी, कल्पकतेने सुंदर चित्रांना त्यांनी साकारले. पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा, मुलगी वाचवा, देश वाचवा, बलात्काराची विकृती थांबवा, प्राणी वाचवा, ग्रह वाचवा, दारू पिऊन वाहन चालवू नका, प्रदूषण टाळा, पृथ्वी वाचवा अशा अनेक सुंदर, सामाजिक संकल्पनांना त्यांनी रंग-रेषांच्या माध्यमातून प्रकट केले.

एरवी मावा, पान, तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांनी बकाल व मृतवत केलेल्या भिंतींमध्ये जीव ओतून विद्यार्थ्यांनी त्यांना अक्षरश: जिवंत केले. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांशी या भिंती बोलू लागल्या आहेत. समाजप्रबोधनाचे अनोखे अखंड कार्य या भिंतींच्या माध्यमातून सुरू झाले आहे.विद्यापीठाच्या सभोवताली चारही बाजूंनी कुंपणभिंत आहे. याठिकाणी सर्व विद्यार्थी जमले आणि त्यांनी ही भित्तीचित्राची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी धडपड सुरू केली. काढलेल्या या चित्रांसमवेत सेल्फी काढत त्यांनी शैक्षणिक कार्यातील सुंदर क्षणांना आपल्या कवेत घेतले. समीर खान, रिध्दी शहा, रूमाना सय्यद, कोमल माळी, सुश्रुत पत्की, श्रीधर सुतार आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले.

टॅग्स :artकलाSangliसांगली