शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अतिरेकी हल्ल्याचा भाजपकडून तीव्र निषेध, सरकार बदला घेईल : देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 13:54 IST

काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा केंद्र सरकार निश्चित बदला घेईल. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी भावना पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केली. दरम्यान, या हल्ल्याचा भाजपच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देअतिरेकी हल्ल्याचा भाजपकडून तीव्र निषेधसर्जिकल स्ट्राईक करून सरकार बदला घेईल : देशमुख

सांगली : काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा केंद्र सरकार निश्चित बदला घेईल. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी भावना पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केली. दरम्यान, या हल्ल्याचा भाजपच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला.आ. सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात भाजप नेत्यांची बैठक झाली. यावेळी पालकमंत्री देशमुख म्हणाले, पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला भ्याड आहे. याचा भाजप तीव्र निषेध करत आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भाजपसह देशातील सर्व नागरिक आहेत. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. याचा बदला सरकार घेईल.

आ. सुधीर गाडगीळ म्हणाले, पुलवामा येथे जवानांवर झालेला हल्ला निषेधार्र्ह आहे. या भ्याड हल्ल्याचा बदला सरकारने घ्यावा. पाकिस्तान थेट युध्दात भारताला हरवू शकत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे अशाप्रकारे भ्याड हल्ले करून भारतीय सैनिकांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या पाठिंब्याने सुरू आहे. याला भारत चोख उत्तर देईल.महापौर संगीता खोत म्हणाल्या, या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. या हल्ल्याचा निषेध करत आहे. प्रकाश बिरजे म्हणाले, भारताला युध्दात पाकिस्तान हरवू शकत नाही. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांना पाकिस्तान पाठिंबा देऊन भारतात अशांतता माजवण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्जिकल स्ट्राईक करून मोदी सरकार या हल्ल्याचा बदला घेईल.

यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, नगरसेवक शेखर इनामदार, विजय घाडगे, भारती दिगडे, सुब्राव मद्रासी, स्वाती शिंदे, प्रकाश बिरजे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSangliसांगलीBJPभाजपा