शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

सरकारला हवाय मनुवाद:फौजिया खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:25 IST

सांगली : भारताच्या राजधानीत संविधानाची होळी केली जाते, तरीसुद्धा पंतप्रधान गप्प राहतात. भाजप सरकारला संविधान नव्हे, तर मनुवाद हवा आहे, हे यावरून सिद्ध होत असल्याचा आरोप माजी मंत्री, राष्टÑवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी बुधवारी येथे केला.राष्ट्रवादीच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रात संविधान बचाव मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत सांगलीत राजमती ...

सांगली : भारताच्या राजधानीत संविधानाची होळी केली जाते, तरीसुद्धा पंतप्रधान गप्प राहतात. भाजप सरकारला संविधान नव्हे, तर मनुवाद हवा आहे, हे यावरून सिद्ध होत असल्याचा आरोप माजी मंत्री, राष्टÑवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी बुधवारी येथे केला.राष्ट्रवादीच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रात संविधान बचाव मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत सांगलीत राजमती भवनमध्ये बुधवारी सभा पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुमनताई पाटील, आ. विद्याताई चव्हाण, प्रदेश सचिव सुरेखा ठाकरे, राजलक्ष्मी भोसले, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महिला आघाडीच्या विनया पाठक, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, इलियास नायकवडी, ताजुद्दीन तांबोळी आदी उपस्थित होते.फौजिया खान म्हणाल्या, केवळ ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा देणाऱ्या सरकारने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत बघ्याची भूमिका स्वीकारली. त्यांचेच आमदार मुली पळविण्याची भाषा करीत आहेत. त्यामुळे सरकारचे धोरण लोकांसमोर स्पष्ट झाले आहे. साडेतीनशे रुपयांचा गॅस ८२० रुपये झाला. पेट्रोल शंभरी गाठत आहे. दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र रोजगार मिळाले नाहीत. महिला असुरक्षित आहेत. दुसरीकडे जाती-पातीची भांडणे सुरू आहेत. राफेलसारखे भ्रष्टाचार बाहेर येत आहेत. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे.आ. विद्याताई चव्हाण म्हणाल्या, संविधानामुळे सर्वसामान्यांना अधिकार मिळाले आहेत. ते अधिकार हिरावून घेण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशात मोदींची हिटलरशाही सुरू आहे. हे आता सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र यामध्ये बॉम्बस्फोट करून समाज बदनाम करण्याचा उद्योग काहींनी केला होता.प्रदेश सचिव सुरेखा ठाकरे, राजलक्ष्मी भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्षा छायाताई पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्वप्नील जाधव, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील, देवराज पाटील आदी उपस्थित होते. आभार संजय बजाज यांनी मानले.मनुस्मृतीचा बचाव!मनुस्मृतीची होळी करताना पोलिसांकडून मज्जाव केला जातो. यावरूनच सरकारची मनुवादी भूमिका स्पष्ट होत आहे. सांगलीतही आंदोलनावेळी आम्हाला सरकारच्या बाबतीत हाच अनुभव आला. आम्ही या गोष्टीबद्दल शासनाचा निषेध करीत आहोत, असे फौजिया खान यावेळी म्हणाल्या.