शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सरकारला हवाय मनुवाद:फौजिया खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:25 IST

सांगली : भारताच्या राजधानीत संविधानाची होळी केली जाते, तरीसुद्धा पंतप्रधान गप्प राहतात. भाजप सरकारला संविधान नव्हे, तर मनुवाद हवा आहे, हे यावरून सिद्ध होत असल्याचा आरोप माजी मंत्री, राष्टÑवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी बुधवारी येथे केला.राष्ट्रवादीच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रात संविधान बचाव मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत सांगलीत राजमती ...

सांगली : भारताच्या राजधानीत संविधानाची होळी केली जाते, तरीसुद्धा पंतप्रधान गप्प राहतात. भाजप सरकारला संविधान नव्हे, तर मनुवाद हवा आहे, हे यावरून सिद्ध होत असल्याचा आरोप माजी मंत्री, राष्टÑवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी बुधवारी येथे केला.राष्ट्रवादीच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रात संविधान बचाव मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत सांगलीत राजमती भवनमध्ये बुधवारी सभा पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुमनताई पाटील, आ. विद्याताई चव्हाण, प्रदेश सचिव सुरेखा ठाकरे, राजलक्ष्मी भोसले, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महिला आघाडीच्या विनया पाठक, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, इलियास नायकवडी, ताजुद्दीन तांबोळी आदी उपस्थित होते.फौजिया खान म्हणाल्या, केवळ ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा देणाऱ्या सरकारने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत बघ्याची भूमिका स्वीकारली. त्यांचेच आमदार मुली पळविण्याची भाषा करीत आहेत. त्यामुळे सरकारचे धोरण लोकांसमोर स्पष्ट झाले आहे. साडेतीनशे रुपयांचा गॅस ८२० रुपये झाला. पेट्रोल शंभरी गाठत आहे. दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र रोजगार मिळाले नाहीत. महिला असुरक्षित आहेत. दुसरीकडे जाती-पातीची भांडणे सुरू आहेत. राफेलसारखे भ्रष्टाचार बाहेर येत आहेत. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे.आ. विद्याताई चव्हाण म्हणाल्या, संविधानामुळे सर्वसामान्यांना अधिकार मिळाले आहेत. ते अधिकार हिरावून घेण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशात मोदींची हिटलरशाही सुरू आहे. हे आता सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र यामध्ये बॉम्बस्फोट करून समाज बदनाम करण्याचा उद्योग काहींनी केला होता.प्रदेश सचिव सुरेखा ठाकरे, राजलक्ष्मी भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्षा छायाताई पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्वप्नील जाधव, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील, देवराज पाटील आदी उपस्थित होते. आभार संजय बजाज यांनी मानले.मनुस्मृतीचा बचाव!मनुस्मृतीची होळी करताना पोलिसांकडून मज्जाव केला जातो. यावरूनच सरकारची मनुवादी भूमिका स्पष्ट होत आहे. सांगलीतही आंदोलनावेळी आम्हाला सरकारच्या बाबतीत हाच अनुभव आला. आम्ही या गोष्टीबद्दल शासनाचा निषेध करीत आहोत, असे फौजिया खान यावेळी म्हणाल्या.