शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कोरोनाबाबत शासनाने अधिक गंभीर व्हावे : फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 17:36 IST

कोरोनाबाबत शासनाने जेवढे गांभीर्य दाखवायला हवे तितके दिसत नाही. शासनाने योग्य नियोजन केले, तरच प्रशासन गतीने काम करते. त्यामुळे शासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देकोरोनाबाबत शासनाने अधिक गंभीर व्हावे : फडणवीस फडणवीस यांनी पत्रकारांशी साधला संवाद

सांगली : कोरोनाबाबत शासनाने जेवढे गांभीर्य दाखवायला हवे तितके दिसत नाही. शासनाने योग्य नियोजन केले, तरच प्रशासन गतीने काम करते. त्यामुळे शासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.ते म्हणाले की, राज्यात सर्वत्र कोरोनाचा आलेख वाढत आहे. परिस्थिती ंिचंताजनक आहे. अशा काळात योग्य नियोजन हवे. महापालिकांना याकामी विशेष निधी देणे, जिल्हा नियोजन समितीमार्फत तसेच अन्य योजनांमधून जिल्हानिहाय मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करणे गरजेचे आहे.

राज्यभरातील अनेक गोरगरीब रुग्णांना महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. रेमिडेसीवीर इंजेक्शनच्या सहा डोसची किंमत ३५ हजार रुपये आहे. खासगी रुग्णालयांमध्येही ते मोफत देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते.

प्रत्यक्षात आता प्रशासकीय स्तरावर तसेच रुग्णालयांना त्यांनी या औषधाचा डोस मोफत दिला जाणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना या औषधाची गरज आहे त्यांना ते मिळत नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीBJPभाजपा