शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तीन कंपन्यांकडून सांगली जिल्हा बँकेत नोकर भरतीचा शासन आदेश रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:15 IST

उच्च न्यायालयाकडून आदेश : नोकरभरतीमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती गठीत

सांगली : राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये नोकर भरती करताना केवळ आयबीपीएस, टीसीएस आणि एमकेसीएल या तीन कंपन्यांमार्फत भरती प्रक्रिया राबवावी, तसेच ७० टक्के उमेदवार स्थानिक आणि ३० टक्के पर जिल्ह्यातील असावेत, असे आदेश राज्य शासनाने दिले होते. जिल्हा बँकांतील भरतीसाठी यापूर्वी नियुक्त सहा कंपन्यांचे पॅनेल रद्द करण्याचे आदेशही राज्य शासनाने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दिले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा आदेश रद्द केला आहे. परिणामी सांगलीसह राज्यातील सर्व जिल्हा बँकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नोकरभरतीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती गठीत केली आहे.याचिकाकर्ता, संबंधित कंपनी आणि हितसंबंधितांबाबत सहकार विभागाच्या प्रधान सचिवांनी चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सदर चौकशीसाठी शासनाने सहकार आयुक्त, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक आणि उपनिबंधक यांची चौकशी समिती गठीत केली आहे. जिल्हा बँकेत सुरू असलेल्या नोकर भरतीबाबत प्राप्त तक्रारींची ही समिती सखोल चौकशी करणार आहे. भरती करणाऱ्या संबंधित एजन्सी, तक्रारदार आणि जिल्हा बँक यांना नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने आपली बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी दिली जाणार आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेने नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होती. मात्र, या भरतीमध्ये कथित भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याने आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री यांनी सांगली जिल्हा बँकेतील नोकर भरतीला स्थगिती दिली. तसेच राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये केवळ आयबीपीएस, टीसीएस आणि एमकेसीएल या तीन कंपन्यांमार्फत नोकर भरती करावी.

या भरतीत ७० टक्के स्थानिक व ३० टक्के पर जिल्ह्यातील उमेदवारांना संधी द्यावी. जर परजिल्ह्यातील उमेदवार न मिळाले, तर स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असे आदेशही राज्य शासनाने दिले. याशिवाय, जिल्हा बँकेच्या नोकर भरतीसाठी पूर्वी नियुक्त सहा कंपन्यांचे पॅनेल रद्द करण्याचे आदेशही शासनाने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दिले होते.या पॅनेल रद्द करण्याच्या आदेशाविरोधात अमरावती येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १४ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयाने शासनाचा ३० ऑक्टोबर २०२५ दिनांकाचा आदेश रद्द केला आहे. यामुळे जिल्हा बँकांना आता कोणत्याही कंपनीमार्फत नोकर भरती करण्यास मुभा मिळाली आहे. हा निर्णय राज्यातील सर्व जिल्हा बँकांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

कोल्हापूर खंडपीठात काय निर्णय होणार?या आदेशाविरोधात सांगली जिल्हा बँकेने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली असून तेथील निकाल प्रलंबित आहे. या निर्णयाकडे जिल्हा बँकेतील संचालकांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Bank Recruitment Order Cancelled: Court Relief for District Banks

Web Summary : Nagpur High Court quashed order mandating recruitment via specific firms. Sangli bank's recruitment, challenged by alleged corruption, now proceeds with pending Kolhapur court decision. Banks get relief.