शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

आटपाडी तालुक्यात शासकीय रुग्णालये व्हेंटिलेटर बेडविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:28 IST

आटपाडी : आटपाडी तालुक्यात सध्या ९४९ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यात एकाही शासकीय रुग्णालयात ...

आटपाडी : आटपाडी तालुक्यात सध्या ९४९ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यात एकाही शासकीय रुग्णालयात एकही व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध नाही. तालुक्यात शासकीय आरोग्य विभागात एकही एमडी डॉक्टर नाही. त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णांना थेट तासगाव, सांगली, मिरज गाठावे लागत आहे. आतापर्यंत ८९ जणांचे बळी गेले आहेत.

तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात केवळ २५ ऑक्सिजन बेड आहेत. ते कायम भरलेले असतात. विशेष म्हणजे तालुक्यात खासगी रुग्णालयात १६१ बेड आहेत. त्यापैकी सहा व्हेन्टिलेटर बेड आहेत. एकूण रुग्णांच्या ८० टक्के रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपचारावर आहेत. बरेच डॉक्टर तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे ते जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण अपुऱ्या औषधांअभावी, चाचणीच्या कीटच्या तुटवड्याने त्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

कोरोनाचा अहवाल मिरज येथील प्रयोगशाळेतून यायला ३ ते ८ दिवस जातात. मधल्या काळात रुग्ण गावभर फिरतो. त्यामुळे संख्या वाढली. त्यामुळे गावेच्या गावे कोरोनाची हॉटस्पॉट बनत चालली आहेत. शासकीय यंत्रणा तोकडी पडल्याने अनेक गावांत स्वतःहून लोकवर्गणीतून कोविड केअर सेंटर उभा केली जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते लोकसहभागातून गोळ्या-औषधे आणि अन्नाची सोय करीत आहेत. दिघंची, झरे, शेटफळे, राजेवाडी, हिवतड, घरनिकी या गावांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

चौकट

एका बेडसाठी दहा नेत्यांचे फोन!

आटपाडीतील ग्रामीण रुग्णालयात २५ बेड आहेत. तिथे एका-एका बेडसाठी दररोज अनेक नेत्यांचे फोन येतात. डॉक्टरांवर दबाव आणला जातो. पण बेड, व्हेंटिलेटर आणि डॉक्टरांची संख्या वाढविण्यात यश आलेले नाही. मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारेपर्यंत दहा नेत्यांचे फोन येतात.

चौकट

गावेच्या गावे हॉटस्पॉट!

गावे आणि सध्याची रुग्णसंख्या

: आटपाडी १७७५, दिघंची ९९९, निंबवडे ३६६, राजेवाडी १९४, शेटफळे ३९४, करगणी १६९, लिंगिवरे ११६, आवळाई १६४, वाक्षेवाडी १३७, हिवतड १६७, झरे ११७, खरसुंडी १२१.

कोट

तालुक्यात शासकीय आरोग्य यंत्रणा अपुरी आहे. पोलिसांची संख्यासुध्दा कमी आहे. ५६ गावे आणि ४२ पोलीस कसे नियंत्रण करणार? नागरिकांनी स्वतःहून नियम पाळण्याची गरज आहे.

- सौ. वृषाली पाटील, सरपंच, आटपाडी