शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

इचलकरंजीला पाणी देताना वारणाकाठालाही न्याय देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:08 PM

तांदुळवाडी : इचलकरंजी शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. परंतु हे पाणी देताना वारणाकाठच्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाणार आहे. अमृत योजनेविषयी शेतकरी आणि इचलकरंजीचे नागरिक यांचा विचार करुन सामंजस्यातून मार्ग काढू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले.वाळवा तालुक्यात शेट्टी यांच्या फंडातून ...

तांदुळवाडी : इचलकरंजी शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. परंतु हे पाणी देताना वारणाकाठच्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाणार आहे. अमृत योजनेविषयी शेतकरी आणि इचलकरंजीचे नागरिक यांचा विचार करुन सामंजस्यातून मार्ग काढू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले.वाळवा तालुक्यात शेट्टी यांच्या फंडातून झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन शनिवारी झाले. यानंतर कणेगाव येथे झालेल्या सभेत शेट्टी बोलत होते. वाळवा पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते राहुल महाडिक अध्यक्षस्थानी होते. जि. प. सदस्य निजाम मुलाणी, स्वाभिमानीचे वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव, महेश पाटील, सयाजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.राहुल महाडिक म्हणाले, जोपर्यंत हातकणंगले लोकसभा मतदार संघात राजू शेट्टी आहेत, तोपर्यंत महाडिक कुटुंब तुमच्या पाठीशीच राहील.यशवंत दूध संघाचे संचालक महेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी एस. यु. संदे, डी. के. पाटील, जगन्नाथ पवार, तानाजी पवार, प्रा. शाहू पाटील, शिवाजी पवार, सी. एम. मोरे, मुरलीधर मांगलेकर, संतोष पाटील, संतोष शेळके, गुंडाभाऊ आवटी, सुदर्शन वाडकर, प्रेम उपाध्ये व कार्यकर्ते उपस्थित होते.शत्रुराष्टÑाकडून साखर आयात कशासाठी?शेट्टी म्हणाले, साखरेचे दर पाडण्यासाठी भाजप सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली आहे. देशात साखरेचे उत्पादन असताना शत्रुराष्ट्राकडून साखर कशासाठी आयात केली? यामुळेच भारतातील साखरेचे भाव गडगडले आहेत. या चुकीच्या निर्णयामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत.