शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

स्मिता पाटील यांना सांगलीची उमेदवारी द्या, राष्ट्रवादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 14:28 IST

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीच्यावतीने सांगली लोकसभा मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे या मागणीबाबत काय निर्णय होणार याकडे राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देस्मिता पाटील यांना सांगलीची उमेदवारी द्या, राष्ट्रवादीची मागणी सांगलीतील कॉंग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांबद्दलही राष्ट्रवादीमार्फत तक्रार

सांगली : कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीच्यावतीने सांगली लोकसभा मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे या मागणीबाबत काय निर्णय होणार याकडे राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.राज्यातील आघाडीच्या जागांच्या आदलाबदलीचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा देण्यासाठीही कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगली वगळता राज्यातील अन्य जागांचा पर्याय शोधावा अशी मागणी केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही स्मिता पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी आणि त्याबदल्यात अन्य कोणत्याही ठिकाणची जागा कॉंग्रेसला द्यावी, असे सुचविले आहे.पक्षाचे प्रदेश सचिव ताजुद्दीन तांबोळी यांच्यासह माजी सभापती संजय पाटील विश्वास तात्या पाटील, दत्ता हावले, विक्रम पाटील, कुलदीप मोरे यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. स्मिता पाटील यांच्या उमेदवारीने भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे.

सध्या कॉंग्रेसकडे अस्तित्वात असलेल्या इच्छुकांपेक्षा राष्ट्रवादीकडे अनेक सक्षम पर्याय आहेत. यामध्ये दिलीपतात्या पाटील, आण्णासाहेब डांगे, अरुणअण्णा लाड यांचा समावेश आहे.उमेदवारीबरोबरच सांगलीतील कॉंग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांबद्दलही राष्ट्रवादीमार्फत तक्रार करण्यात येणार असल्याचे तांबोळी यांनी म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आघाडीतील मित्रपक्ष म्हणून एकाही राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांशी कॉंग्रेस नेत्यांनी संवाद साधला नाही.

राष्ट्रवादीला दुर्लक्षित करून एकांगीपणाने कॉंग्रेसची वाटचाल सुरू आहे. त्यांच्यामागे आम्ही फरफटत जाणार नाही. उमेदवारी किंवा रणनिती आखताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कधीही विश्वासात घेतले जात नाही. आजपर्यंत कधीही सामुहिक बैठक घेतली नाही. राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याशी सल्लामसलत केलेली नाही. त्यांची जर एकला चलो ही भूमिका घेतली असेल तर आम्हालाही त्यांची गरज नाही.

कॉंग्रेसमध्ये जो पोरखेळ सुरू आहे तो अत्यंत क्लेशदायक आहे. आज पतंगराव कदम, आर. आर. पाटील, मदन पाटील हे नेते असते तर आघाडीची एवढी वाईट अवस्था झाली नसती. कॉंग्रेसमुळे राष्ट्रवादी ची नाचक्की होत आहे.

दोन दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे या मतदारसंघाची मागणी करणार आहोत. कॉंग्रेसकडे आम्ही आता पायघड्या घालणार नाही. त्यांच्यातील भांडणाचा फायदा नक्कीच भाजपला होऊ शकतो, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSangliसांगली