शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शेतकऱ्यांना पाच हजार पेन्शन द्या-: मिरजेत म्हैसाळ रस्ता, खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:01 IST

साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार पेन्शन, श्रावणबाळ निराधार योजनेच्या पेन्शनमध्ये दोन हजार रुपयापर्यंत भरीव वाढ करण्याच्या मागणीसाठी जनता (सेक्युलर) दलातर्फे मिरज

ठळक मुद्दे जनता दलाचे आंदोलन

मिरज/विटा : साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार पेन्शन, श्रावणबाळ निराधार योजनेच्या पेन्शनमध्ये दोन हजार रुपयापर्यंत भरीव वाढ करण्याच्या मागणीसाठी जनता (सेक्युलर) दलातर्फे मिरज-म्हैसाळ मार्गावरील उड्डाण पुलावर रास्ता रोको आंदोलन केले. एक तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.

राज्य जनता दलाने साठ वर्षावरील वयोवृध्द शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार पेन्शन करावी व निराधार लाभार्थ्यांच्या पेन्शनमध्ये भरीव वाढ करावी या मागणीसाठी गेली दहा वर्षे राज्यव्यापी आंदोलन, मोर्चे, संघर्ष यात्रा, रास्ता रोको अशा अनेक मार्गाने आंदोलन केली. मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा व पंजाब सरकारने वयोवृध्द शेतकºयांना पेन्शन लागू केली आहे. मात्र राज्य शासनाने आश्वासनाशिवाय शेतकºयांना काहीच दिले नाही. राज्य शासनाने जाहीर केलेल्या योजना फसव्या आहेत.

जनता दलाने केलेल्या मागण्यांचा लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घ्यावा, या मागणीसाठी सोमवारी राज्य जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनता दलाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के. डी. शिंदे, अ‍ॅड. फैयाज झारी, जिनगोंडा पाटील, युसूफ मुल्ला, संजय ऐनापुरे, शेतकरी संघटनेचे बी. आर. पाटील, समाजवादी पार्टीचे सुलेमान आलासे, एम. के. माळी यांनी आंदोलन केले. अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. शेतकºयांच्या व निराधार लाभार्थ्यांच्या मागण्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला. आंदोलनामुळे मिरज-म्हैसाळ मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प होती. आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी होते.

दरम्यान, देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्टÑ शासनानेही ज्येष्ठ नागरिकांना दरमहा २ हजार रुपये पेन्शन सुरू करावी, या मागणीसाठी सोमवारी जनता दलाच्यावतीने भिवघाट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. शरद पाटील यांनी केले. यावेळी आंदोलकांनी चारही मार्ग रोखून धरल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली.देशातील १२ राज्यांत ज्येष्ठ नागरिकांना दरमहा पेन्शन दिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देण्याची घोषणा केली होती. परंतु, शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ज्येष्ठांवर अन्याय केला असल्याचे माजी आ. शरद पाटील यांनी आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना सांगितले.

या आंदोलनात आबासाहेब सागर, प्रा. लक्ष्मण शिंदे, जगन्नाथ माने, बाबासाहेब पाटील, भानुदास सूर्यवंशी, रघुनाथ रास्ते, गोपीनाथ सूर्यवंशी, बापूलाल मुलाणी, आर. व्ही. पाटील, दिलीप गायकवाड, वसंत मंडले, पोपट खराडे, समाधान पाटील, शैलजा भिंगारदेवे, राधिका जगताप, विजय चव्हाण, काकासाहेब शिंदे, प्रतिभा चव्हाण, सुनील लोंढे, डॉ. रमा घाडगे, महादेव गुरव यांच्यासह खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. विटा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

आंदोलकांमुळे पोलिसांची तारांबळभिवघाट येथे संतप्त आंदोलकांनी पंढरपूर-नागज महामार्ग रोखून धरल्याने वाहतूक दोन तासासाठी ठप्प झाली. वाहनांची लांबच्या लांब रांग लागली होती. आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर, साने गुरूजी यांच्या ‘आता उठवू सारे रान...’ या गीताने रास्ता रोको आंदोलनाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीFarmer strikeशेतकरी संप