शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांना प्रतिटन ७०० रुपये अनुदान द्या: सांगलीत कारखानदारांची शासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:02 IST

साखर दरातील प्रचंड घसरणीमुळे जिल्ह्यातील साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. कारखान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने ऊस गाळपाला प्रतिटन ७०० रुपये आणि केंद्राने

ठळक मुद्देनिर्यातीसाठी प्रति क्विंटल साखरेला १५० रुपये अनुदान द्यावे

सांगली : साखर दरातील प्रचंड घसरणीमुळे जिल्ह्यातील साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. कारखान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने ऊस गाळपाला प्रतिटन ७०० रुपये आणि केंद्राने निर्यातीसाठीच्या अनुदानात वाढ करून प्रति क्विंटलला १५० रुपये अनुदान देण्याची मागणी शासनाकडे करण्याचा निर्णय साखर कारखाना अध्यक्ष, प्रतिनिधींच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला.

दरम्यान, साखर उद्योगातील अडचणी वाढत चालल्याने सर्वच साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये आहेत. यामुळे जिल्हा बँकही अडचणीत येण्याची भीती असून रिझर्व्ह बँकेने एनपीए धोरण बदलण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रियाही यावेळी प्रतिनिधींनी व्यक्त केली.

साखर कारखान्यांच्या अडचणी व पर्यायाने त्यामुळे जिल्हा बँकेसमोर निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेत बैठक झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गाळप हंगाम सुरु करण्यासाठी प्रत्येक कारखान्यांना १५ कोटी कर्ज आवश्यक आहे. परंतु, शॉर्ट मार्जिनमुळे कर्जच देता येत नाही, अशी स्थिती आहे. तसेच कारखान्यांची थकीत कर्जे एनपीएत न धरण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या संकटातून बाहेर येण्यासाठी साखर कारखान्यांना प्रतिटन ७०० रूपये अनुदान देण्यात यावे व निर्यातीचे ५५ रूपयांचे अनुदान वाढवून ते १५० रूपये करावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.यावेळी आ. मोहनराव कदम, ‘महांकाली’च्या अध्यक्षा अनिता सगरे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक प्रतापसिंह चव्हाण, सरव्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग, सूर्यकांत पाटील, शरद कदम, जयकर पाटील, मृत्युंजय शिंदे, मनोज सगरे, एन. एम. मोटे, कालिदास थोरात, एस. एम. वामने आदी उपस्थित होते.देशात विक्रमी साखरेचे उत्पादनयंदा देशात विक्रमी साखर उत्पादन झाल्याने संपूर्ण साखर उद्योग संकटात सापडला आहे. देशात यंदा साखरेचे उत्पादन २८५ लाख टन अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३१६ लाख टन झाले आहे. उत्तर प्रदेशमधून साखर घेतली तर वाहतूक खर्च कमी येत असल्याने गुजरात, राजस्थानसह इतर भागात सांगली-कोल्हापूरमधून जाणाºया साखरेचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्यात यंदा उत्पादित साखरेतील केवळ १५ टक्के साखर विकली गेली आहे. उर्वरित साखर विक्रीविना पडून असल्याची माहिती साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी दिली.बैठकीतील मागण्या...सरकारने ऊस कारखान्यांना गाळप केलेल्या उसावर प्रतिटन ७०० रुपये अनुदान द्यावेकारखान्यांनी निर्यात केलेल्या साखरेस ५५ रूपयांऐवजी किमान १५० रुपये अनुदान द्यावेशॉर्ट मार्जिनमुळे थकीत जाणारी कर्जे एनपीएमध्ये धरु नयेत

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने