शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

द्राक्षांसाठी विम्याचा लाखोंचा हप्ता भरला, तरीही मोबदला शून्य : बागायतदारांची कैफियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:24 IST

दत्ता पाटील ।तासगाव : फळबागांसाठी हवामान आधारित पीक विमा योजना विमा कंपन्यांच्या जाचक अटी आणि निकषांमुळे कुचकामी ठरत आहे. अवकाळी, गारपिटीने सातत्याने द्राक्षबागांचे नुकसान होत आहे. मात्र निकषांत बसत नसल्याने विम्यासाठी लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करूनदेखील मोबदला मिळत नाही.तीन दिवसांपासून तासगाव तालुक्यात गारपिटीने येळावी, विसापूर, आरवडेसह अनेक गावांत द्राक्षबागांचे मोठे ...

ठळक मुद्देविमा कंपन्यांच्या जाचक नियमांचा विळखा; चुकीचे निकष, अवकाळी आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड

दत्ता पाटील ।तासगाव : फळबागांसाठी हवामान आधारित पीक विमा योजना विमा कंपन्यांच्या जाचक अटी आणि निकषांमुळे कुचकामी ठरत आहे. अवकाळी, गारपिटीने सातत्याने द्राक्षबागांचे नुकसान होत आहे. मात्र निकषांत बसत नसल्याने विम्यासाठी लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करूनदेखील मोबदला मिळत नाही.

तीन दिवसांपासून तासगाव तालुक्यात गारपिटीने येळावी, विसापूर, आरवडेसह अनेक गावांत द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीने झोडपल्यामुळे दुसºयांदा खरड छाटणी घ्यावी लागली आहे, तर अनेक ठिकाणी द्राक्षवेलींना फळधारणेची शाश्वती धूसर आहे.

गतवर्षीही फळ छाटणीनंतर अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे नुकसान झाले होते. शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे यांनीही बोरगाव येथे नुकसानग्रस्त बागांची पाहणी केली होती. कर्ज असणाºया द्राक्षबागांना पीक विमा सक्तीचा आहे, तर कर्ज नसणाºया द्राक्ष बागायतदारांनीही पीक विमा घेतलेला आहे. हवामान आधारित पीक विमा घेण्यासाठी शेतकºयांनी लाखो रुपये खर्ची टाकले आहेत. एकट्या जिल्हा बँकेत ९३२ कर्जदार, तर २९ बिगर कर्जदारांनी पीक छाटणीच्या काळातील अवकाळी विमा घेतला आहे, तर १५३ शेतकºयांनी गारपिटीच्या कालावधीसाठीचा पीक विमा घेतला आहे.

या विम्यासाठी द्राक्ष बागायतदारांना तब्बल ६८ लाख ७४ हजार १२८ रुपये भुर्दंड बसला आहे. ही रक्कम केवळ जिल्हा बँकेशी संबंधित आणि एका वर्षाची आहे.विमा कंपन्यांकडून अवकाळीच्या नुकसान भरपाईसाठी १६ आॅक्टोबर ते ३१ मार्च हा कालावधी आहे, तर गारपिटीसाठी १ जानेवारी ते ३० एप्रिल हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र आता होत असलेली गारपीटविमा कंपनीची मुदत संपल्यानंतर होत आहे. या गारपिटीच्या नुकसानीला विमा लागू होत नाही. गतवर्षी अवकाळीचा पाऊस आॅक्टोबरपूर्वी झाला होता. त्यामुळे द्राक्षबागांचे कोट्यवधीचे नुकसान होऊनदेखील भरपाई मिळाली नाही.हवामानाचा निकष फोलगेल्यावर्षी बोरगाव (ता. तासगाव) येथे रस्त्याच्या एका बाजूला अवकाळीचा जोरदार पाऊस झाला होता, तर दुसºया बाजूला पाऊसच झाला नाही. दोन दिवसांपूर्वी येळावीतही काही भागात गारपिटीचा तडाखा बसला, तर काही भागात गारपीट झाली नाही. मात्र विमा कंपन्यांचा निकष हवामानआधारित आणि हवामान केंद्रांशी निगडित आहे. परिणामी नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून भरपाईसाठी हात वर केले जात आहेत. 

हवामानआधारित पीक विमा योजनेत अनेक जाचक अटी आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने द्राक्षासह अन्य फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र निकषांत बसत नसल्यामुळे लाखो रुपये पीक विम्यासाठी भरुनदेखील कवडीचीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. पीक विम्याचा कालावधी न पाहता, वर्षभर पीक विमा लागू करावा, अशी मागणी यापूर्वीच केली आहे.- अर्जुन पाटील, जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी