शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

द्राक्षांसाठी विम्याचा लाखोंचा हप्ता भरला, तरीही मोबदला शून्य : बागायतदारांची कैफियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:24 IST

दत्ता पाटील ।तासगाव : फळबागांसाठी हवामान आधारित पीक विमा योजना विमा कंपन्यांच्या जाचक अटी आणि निकषांमुळे कुचकामी ठरत आहे. अवकाळी, गारपिटीने सातत्याने द्राक्षबागांचे नुकसान होत आहे. मात्र निकषांत बसत नसल्याने विम्यासाठी लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करूनदेखील मोबदला मिळत नाही.तीन दिवसांपासून तासगाव तालुक्यात गारपिटीने येळावी, विसापूर, आरवडेसह अनेक गावांत द्राक्षबागांचे मोठे ...

ठळक मुद्देविमा कंपन्यांच्या जाचक नियमांचा विळखा; चुकीचे निकष, अवकाळी आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड

दत्ता पाटील ।तासगाव : फळबागांसाठी हवामान आधारित पीक विमा योजना विमा कंपन्यांच्या जाचक अटी आणि निकषांमुळे कुचकामी ठरत आहे. अवकाळी, गारपिटीने सातत्याने द्राक्षबागांचे नुकसान होत आहे. मात्र निकषांत बसत नसल्याने विम्यासाठी लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करूनदेखील मोबदला मिळत नाही.

तीन दिवसांपासून तासगाव तालुक्यात गारपिटीने येळावी, विसापूर, आरवडेसह अनेक गावांत द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीने झोडपल्यामुळे दुसºयांदा खरड छाटणी घ्यावी लागली आहे, तर अनेक ठिकाणी द्राक्षवेलींना फळधारणेची शाश्वती धूसर आहे.

गतवर्षीही फळ छाटणीनंतर अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे नुकसान झाले होते. शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे यांनीही बोरगाव येथे नुकसानग्रस्त बागांची पाहणी केली होती. कर्ज असणाºया द्राक्षबागांना पीक विमा सक्तीचा आहे, तर कर्ज नसणाºया द्राक्ष बागायतदारांनीही पीक विमा घेतलेला आहे. हवामान आधारित पीक विमा घेण्यासाठी शेतकºयांनी लाखो रुपये खर्ची टाकले आहेत. एकट्या जिल्हा बँकेत ९३२ कर्जदार, तर २९ बिगर कर्जदारांनी पीक छाटणीच्या काळातील अवकाळी विमा घेतला आहे, तर १५३ शेतकºयांनी गारपिटीच्या कालावधीसाठीचा पीक विमा घेतला आहे.

या विम्यासाठी द्राक्ष बागायतदारांना तब्बल ६८ लाख ७४ हजार १२८ रुपये भुर्दंड बसला आहे. ही रक्कम केवळ जिल्हा बँकेशी संबंधित आणि एका वर्षाची आहे.विमा कंपन्यांकडून अवकाळीच्या नुकसान भरपाईसाठी १६ आॅक्टोबर ते ३१ मार्च हा कालावधी आहे, तर गारपिटीसाठी १ जानेवारी ते ३० एप्रिल हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र आता होत असलेली गारपीटविमा कंपनीची मुदत संपल्यानंतर होत आहे. या गारपिटीच्या नुकसानीला विमा लागू होत नाही. गतवर्षी अवकाळीचा पाऊस आॅक्टोबरपूर्वी झाला होता. त्यामुळे द्राक्षबागांचे कोट्यवधीचे नुकसान होऊनदेखील भरपाई मिळाली नाही.हवामानाचा निकष फोलगेल्यावर्षी बोरगाव (ता. तासगाव) येथे रस्त्याच्या एका बाजूला अवकाळीचा जोरदार पाऊस झाला होता, तर दुसºया बाजूला पाऊसच झाला नाही. दोन दिवसांपूर्वी येळावीतही काही भागात गारपिटीचा तडाखा बसला, तर काही भागात गारपीट झाली नाही. मात्र विमा कंपन्यांचा निकष हवामानआधारित आणि हवामान केंद्रांशी निगडित आहे. परिणामी नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून भरपाईसाठी हात वर केले जात आहेत. 

हवामानआधारित पीक विमा योजनेत अनेक जाचक अटी आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने द्राक्षासह अन्य फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र निकषांत बसत नसल्यामुळे लाखो रुपये पीक विम्यासाठी भरुनदेखील कवडीचीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. पीक विम्याचा कालावधी न पाहता, वर्षभर पीक विमा लागू करावा, अशी मागणी यापूर्वीच केली आहे.- अर्जुन पाटील, जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी