शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

गड आला, पण सिंह गेला..!

By admin | Updated: June 4, 2014 00:02 IST

सांगलीत मुंडेंना आदरांजली : भाजपच्या कार्यकर्त्यांना भावना अनावर

सांगली : केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त सांगलीत धडकताच संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. टिळक स्मारक मंदिरात आयोजित आदरांजली सभेत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळविले. या यशात मुंडेंचा मोठा वाटा होता. गड आला, पण महाराष्ट्राचा सिंह गेला, अशा शब्दात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. भाजपचे खासदार संजय पाटील, नीता केळकर, दीपक शिंदे-म्हैसाळकर, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, धनपाल खोत, जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने, प्रकाश बिरजे, हणमंत पवार, बाळासाहेब कुलकर्णी, युवराज बावडेकर यांच्यासह भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. खा. पाटील म्हणाले की, १९९५ मध्ये मुंडेंनी मला राज्यमंत्री पदाची आॅफर दिली. तेव्हापासून आमचा स्नेह होता. खासदारकीची उमेदवारीही त्यांनीच दिली. त्यांच्या निधनाने राज्यात भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. गरिबांची जाण असलेले ते नेते होते. राजकीय वारसा नसतानाही मोठ्या कष्टाने ते अत्युच्च पातळीवर पोहोचले. त्यांच्या निधनाने पृथ्वी गरीब झाली आणि स्वर्ग श्रीमंत झाला आहे. नीता केळकर म्हणाल्या की, मुंडे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. प्रत्येक कार्यकर्त्याला ते नावानिशी ओळखत. वसंतदादा यांच्यानंतर कार्यकर्त्यांना जाणणारे एकमेव नेते होते. ते व नितीन गडकरी यांच्या केंद्रीय मंत्रिपदामुळे राज्यातील जनता सुखावली होती; पण त्यांच्या निधनाने गड आला, पण सिंह गेला, अशी स्थिती झाली आहे. सुधीर गाडगीळ म्हणाले की, मुंडे यांच्याशी आमचे कौटुंबिक स्नेह होता. त्यांना कधीही विसरता येणार नाही. त्यांचे हृदयातील स्थान कायम राहील. दीपक शिंदे म्हणाले की, मुंडे यांनी विश्वास दिल्याने आपण भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वच्छ मनाचा निर्भय नेता हरपला आहे. त्यांच्या निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाले. (प्रतिनिधी)