शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

टेंभू उपसा योजनेसाठी ५०० कोटींचा निधी द्या

By admin | Updated: March 18, 2015 00:03 IST

ठिबकचा वापर करा : श्रमिक मुक्ती दलाची मोर्चाद्वारे मागणी

सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे मुख्य आणि पोटकालवे वगळता बंद जलवाहिनीद्वारेच पाणी शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ५०० कोटी रूपये निधीची येत्या अंदाजपत्रकात तरतूद करावी, या प्रमुख मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. कार्यकर्त्यांचा उद्रेक लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाच्या वारणाली (सांगली) येथील कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.सांगलीतील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात झाली. कडेगाव, आटपाडी, खानापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी होते. वारणाली येथील पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर शिष्टमंडळाने सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाणे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पाटणकर यांनी टेंभू योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ५०० कोटींच्या निधी तरतूद करावी, ही मागणी शासनाकडे पाठवावी. शासनाने या नदीची तरतूद केली नाही, तर बेमुदत आंदोलनाला बसण्याचा इशारा दिला आहे. मुख्य आणि पोटकालवे वगळता शेतीला बंद जलवाहिनीद्वारेच पाणी द्यावे. टेंभू योजनेचे कार्यक्षेत्र असलेल्या सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील सात तालुक्यांतील शंभर टक्के शेतीला ठिबकद्वारेच पाणी देण्याच्या मागणीबाबतही चर्चा झाली. शासनाकडे मागण्यांचे निवेदन देण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. ठिबक सिंचन योजनेस प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासन सर्व सहकार्य करेल, असेही गुणाणे यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.आंदोलनात आनंदराव पाटील, विजयसिंह पाटील, मोहनराव यादव, अण्णासाहेब पत्की, अशोक लवटे, अमोल कुंभार, भारत पाटील, दत्तात्रय पाटील, जालिंदर मेटकरी आदींसह शेतकरी सहभागी होते. (प्रतिनिधी)