शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

टेंभू उपसा योजनेसाठी ५०० कोटींचा निधी द्या

By admin | Updated: March 18, 2015 00:03 IST

ठिबकचा वापर करा : श्रमिक मुक्ती दलाची मोर्चाद्वारे मागणी

सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे मुख्य आणि पोटकालवे वगळता बंद जलवाहिनीद्वारेच पाणी शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ५०० कोटी रूपये निधीची येत्या अंदाजपत्रकात तरतूद करावी, या प्रमुख मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. कार्यकर्त्यांचा उद्रेक लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाच्या वारणाली (सांगली) येथील कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.सांगलीतील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात झाली. कडेगाव, आटपाडी, खानापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी होते. वारणाली येथील पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर शिष्टमंडळाने सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाणे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पाटणकर यांनी टेंभू योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ५०० कोटींच्या निधी तरतूद करावी, ही मागणी शासनाकडे पाठवावी. शासनाने या नदीची तरतूद केली नाही, तर बेमुदत आंदोलनाला बसण्याचा इशारा दिला आहे. मुख्य आणि पोटकालवे वगळता शेतीला बंद जलवाहिनीद्वारेच पाणी द्यावे. टेंभू योजनेचे कार्यक्षेत्र असलेल्या सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील सात तालुक्यांतील शंभर टक्के शेतीला ठिबकद्वारेच पाणी देण्याच्या मागणीबाबतही चर्चा झाली. शासनाकडे मागण्यांचे निवेदन देण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. ठिबक सिंचन योजनेस प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासन सर्व सहकार्य करेल, असेही गुणाणे यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.आंदोलनात आनंदराव पाटील, विजयसिंह पाटील, मोहनराव यादव, अण्णासाहेब पत्की, अशोक लवटे, अमोल कुंभार, भारत पाटील, दत्तात्रय पाटील, जालिंदर मेटकरी आदींसह शेतकरी सहभागी होते. (प्रतिनिधी)