शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

पलूस कोविड रुग्णालयात फळेवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

—————————- भाजीसाठी गर्दी सांगली : सध्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. होलसेल व्यापाऱ्यांना शनिवारअखेर ठराविक वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी ...

—————————-

भाजीसाठी गर्दी

सांगली : सध्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. होलसेल व्यापाऱ्यांना शनिवारअखेर ठराविक वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी होती; पण याबरोबर भाजी विक्रेतेही मैदानात उतरले असून, सकाळ सत्रात भाजी खरेदीसाठी झुंबड उडते. वाढत्या रुग्णसंख्येत हा प्रकार धोकादायक ठरत आहे.

——————————————-

चेस प्राइड क्लबतर्फे ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

सांगली : सांगली चेस प्राइड क्लब, न्यूयॉर्कतर्फे मोफत ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेस सांगलीमधील पुरोहित चेस अकॅडमीचे सहकार्य प्राप्त होणार आहे, अशी माहिती बुद्धिबळ प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित यांनी दिली. ही स्पर्धा खुल्या स्वरूपाची असून, एकूण ११ फेऱ्या घेतल्या जातील.

—————————————

भिलवडीत वादळी वारे, पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

भिलवडी : भिलवडी व परिसरामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी, पपई पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या केळी व पपईच्या बागा जमीनदोस्त झालेल्या आहेत. हातातोंडाशी आलेले केळीचे पीक मुळासकट उपटून पडल्यामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

————-

गैरवर्तणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी : गायकवाड

सांगली : सध्या सुरू असलेल्या बिकट परिस्थितीत काही लोक डॉक्टर व पोलिसांशी गैरवर्तन करून त्यांच्यावर हल्ले करीत आहेत. ही बाब दुर्दैवी असून, निषेधार्ह आहे. अशा बेकायदेशीर वर्तणूक करणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा सरकारने उगारावा, अशी मागणी शशिकांत गायकवाड यांनी केली आहे.

——————————-

संख येथे आशा वर्कर्सना आरोग्य साहित्य वाटप

संख : संख ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगमधून संख येथील ११ आशा वर्कर्सना आरोग्य साहित्याचे वाटप सरपंच मंगलताई पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर कोळी, माजी उपसरपंच एम.आर. जिगजेणी, ग्रामविकास अधिकारी के.डी. नरळे यांच्या हस्ते करण्यात आले.

—————————

जतमध्ये वाळू उपसा

संख : जत तालुक्यातील पांढरेवाडी येथे बोर नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन वाहनांवर महसूल विभागाने कारवाई करून वाहने संख अपर तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली आहेत. पूर्व भागातील बोर नदीचे पात्र ६४ किलोमीटर अंतर इतके आहे. बोर नदी वाळूतस्करीचे केंद्र आहे. यामुळे नदीपात्रालगतच्या शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पाण्याची पातळी खालवली आहे.