शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

चालू हंगामातील साखर उताऱ्यावरच एफआरपी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:30 IST

सांगली : मागील गळीत हंगामातील साखर उताऱ्यावर एफआरपी ठरविली जात होती; पण या गळीत हंगामापासून एफआरपी ठरविण्यासाठी यावर्षीच्याच साखर ...

सांगली : मागील गळीत हंगामातील साखर उताऱ्यावर एफआरपी ठरविली जात होती; पण या गळीत हंगामापासून एफआरपी ठरविण्यासाठी यावर्षीच्याच साखर उताऱ्याचा वापर केला जाणार आहे. यास राज्य शासनाने कारखानदारांना परवानगी दिल्यामुळे एफआरपीचे तुकडे पडणार, हे निश्चित झाले आहे. यामुळे कारखानदारांच्या या भूमिकेविरोधात आवाज उठविणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटना सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले यांनी दिली.

संजय कोले म्हणाले की, येत्या गळीत हंगामात २०२१-२२ च्या साखर उताऱ्यानुसार एफआरपी दिली जाणार आहे. साखर कारखानदार व त्यांच्या संघटनांची दीर्घकाळापासून ही मागणी होती. हंगाम संपल्यानंतर १५ दिवसांत अंतिम साखर उताऱ्यानुसार एफआरपी निश्चित करून पुढील हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल. अर्थात या शिफारसी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ऊस नियंत्रण मंडळाकडे पाठवून मान्यता घेतली जाईल. अशाप्रकारे एफआरपी ठरवण्यासाठी केंद्राच्या ग्राहक हित, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ऊस नियंत्रण आदेश-१९६६ च्या कलम-११ व्दारे राज्यांना अधिकार दिले आहेत. ऑक्टोबर २०२० मधील अधिसूचनेनुसार कारखानानिहाय एफआरपी ठरविली जाणार आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार एकरकमी एफआरपीचा मुद्दा पूर्णत: निकालात निघाला आहे. हे धोरण कारखानदारांसाठी फायदेशीर, तर शेतकऱ्यांसाठी अन्यायी आहे. शासनाच्या एफआरपी ठरविण्याच्या नवीन धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून चर्चासत्र घेण्यात येणार आहे. यानंतर शेतकरी संघटनेची आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.