शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चालू हंगामातील साखर उताऱ्यावरच एफआरपी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:30 IST

सांगली : मागील गळीत हंगामातील साखर उताऱ्यावर एफआरपी ठरविली जात होती; पण या गळीत हंगामापासून एफआरपी ठरविण्यासाठी यावर्षीच्याच साखर ...

सांगली : मागील गळीत हंगामातील साखर उताऱ्यावर एफआरपी ठरविली जात होती; पण या गळीत हंगामापासून एफआरपी ठरविण्यासाठी यावर्षीच्याच साखर उताऱ्याचा वापर केला जाणार आहे. यास राज्य शासनाने कारखानदारांना परवानगी दिल्यामुळे एफआरपीचे तुकडे पडणार, हे निश्चित झाले आहे. यामुळे कारखानदारांच्या या भूमिकेविरोधात आवाज उठविणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटना सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले यांनी दिली.

संजय कोले म्हणाले की, येत्या गळीत हंगामात २०२१-२२ च्या साखर उताऱ्यानुसार एफआरपी दिली जाणार आहे. साखर कारखानदार व त्यांच्या संघटनांची दीर्घकाळापासून ही मागणी होती. हंगाम संपल्यानंतर १५ दिवसांत अंतिम साखर उताऱ्यानुसार एफआरपी निश्चित करून पुढील हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल. अर्थात या शिफारसी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ऊस नियंत्रण मंडळाकडे पाठवून मान्यता घेतली जाईल. अशाप्रकारे एफआरपी ठरवण्यासाठी केंद्राच्या ग्राहक हित, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ऊस नियंत्रण आदेश-१९६६ च्या कलम-११ व्दारे राज्यांना अधिकार दिले आहेत. ऑक्टोबर २०२० मधील अधिसूचनेनुसार कारखानानिहाय एफआरपी ठरविली जाणार आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार एकरकमी एफआरपीचा मुद्दा पूर्णत: निकालात निघाला आहे. हे धोरण कारखानदारांसाठी फायदेशीर, तर शेतकऱ्यांसाठी अन्यायी आहे. शासनाच्या एफआरपी ठरविण्याच्या नवीन धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून चर्चासत्र घेण्यात येणार आहे. यानंतर शेतकरी संघटनेची आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.