शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पेन्शनसाठी आटपाडी तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: March 3, 2015 23:02 IST

जनता दलातर्फे आयोजन : परिषदेतून मुख्यमंत्र्यांना १0 हजार पत्रे पाठविली

आटपाडी : राज्य शासनाच्यावतीने ६० वर्षापुढील सर्व नागरिकांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, या मागणीसाठी जनता दलाच्यावतीने आज (मंगळवारी) येथील तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. बचत धाम इमारतीच्या आवारात पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेन्शनसाठी निधीची तरतूद करावी आणि तात्काळ नागरिकांच्या खात्यावर पेन्शन जमा करावी यासाठी आज सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ६0 वर्षापुढील हजारो नागरिकांची पेन्शन परिषद झाली. येथील बस स्थानकापासून व्यापारी पेठेतून बचत धामपर्यंत मोर्चा काढण्यात आला. टपाल कार्यालयाजवळ मोर्चा येताच आंदोलकांनी ‘शासनाने पेन्शन चालू करावी’ अशी मागणी करणारी दहा हजार पोस्टकार्ड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यासाठी टपाल कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे दिली.परिषदेत प्रा. शरद पाटील म्हणाले, यापूर्वी ६० वर्षापुढील सर्वांना पेन्शन चालू करु म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी झाली पाहिजे. तोपर्यंत हा लढा थांबणार नाही.आबा सागर म्हणाले, सध्या गोवा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, ओरिसा, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम, उत्तराखंड, मध्य प्रदेश या राज्यात ६० वर्षापुढील नागरिकांना पेन्शन चालू आहे. महाराष्ट्रात, देशात आमदारांना सर्वाधिक पेन्शन आहे. मग सर्वसामान्यांना का नाही? अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने तरतूद केली नाही, तर मंत्रालयावर याच महिन्यात धडक मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.यावेळी अ‍ॅड. के. डी. शिंदे, रावसाहेब पाटील, वसंतराव पाटील, शिवाजीराव परुळेकर, नाथा ऐवळे, पतंगराव गायकवाड, तुकाराम कुटे, तुकाराम जुगदर, पांडुरंग वाक्षे, सुवर्णा जावीर यांची भाषणे झाली. अर्जुन बाबर, लक्ष्मण दबडे, कुबेर मुंझे, आनंदा कोळेकर, वैभव चव्हाण, नाथा गलांडे, सुवर्णा जरग, नागरिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)परिषदेतील ठरावशासकीय, निमशासकीय नोकरदारांच्या पगारातील १0 टक्के रक्कम त्यांच्या आई-वडिलांच्या नावे जमा करावी.विनाकट ६0 वर्षापुढील सर्व नागरिकांना इतर राज्यांप्रमाणे दरमहा दोन हजार रुपये पेन्शन द्यावी.जमीन अधिग्रहण कायदा रद्द करावाकॉ. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि सूत्रधारांचा छडा लावावा.