शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वीज दरवाढीविरोधात मोर्चा

By admin | Updated: December 22, 2016 00:02 IST

इरिगेशन फेडरेशन आक्रमक : ‘महावितरण’च्या कारभाराचा सांगलीत निषेध

सांगली : इरिगेशनच्या शेतीपंपाच्या बिलावर केलेली व्हिलिंग चार्जेसची आकारणी बंद करण्यात यावी, शेतीपंपास मीटर बसविण्यात यावेत, शेतीपंपांच्या मीटरचे रीडिंग घेऊनच वीज बिलांची आकारणी करण्यात यावी, यांसह इतर मागण्यांसाठी बुधवारी राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने विश्रामबाग येथील ‘महावितरण’च्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरूवात झाली. महावितरणने व्हिलिंग चार्जेस म्हणून प्रति युनिट ८२ पैसे वाढ लागू केल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. प्रसंगी आक्रमक भूमिका घेऊन, महावितरणला निर्णय बदलण्यास भाग पाडण्याचा इशाराही कार्यक र्त्यांनी दिला. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी गावाने एकत्र येऊन लिफ्ट इरिगेशन योजना उभारल्या आहेत. प्रसंगी स्वत:ची जमीन गहाण ठेवून, कर्ज काढून योजनांची उभारणी करण्यात आली आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असताना, शासनाकडून यास कोणतीही मदत मिळालेली नाही. अशा परिस्थितीत १ जून २०१५ ला वीज बिलात प्रति युनिट ४४ पैशांची वाढ करण्यात आली. यास इरिगेशन फेडरेशनने विरोध केल्यानंतर दर कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले. आता व्हिलिंग चार्जेस म्हणून ८२ पैसे प्रति युनिट वाढ लागू केली आहे. त्यामुळे दुप्पट वीज बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे इरिगेशन योजना बंद पडणार आहेत. यावेळी अरूण लाड, माजी आ. संजय घाटगे, विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील, आप्पासाहेब पाटील, प्रतापराव होगाडे, जे. पी. लाड, आर. जे. तांबे, दिनकर पाटील, अ‍ॅड. सयाजीराव पाटील, अ‍ॅड. अजितराव सूर्यवंशी, तेजस्विनी सूर्यवंशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वीज तोडणाऱ्यांचे हात रोखा : एन. डी. पाटीलशेतकरीवर्ग अगोदरच अडचणीत असताना, महावितरणकडून दरवाढ करून अन्याय केला आहे. ही दरवाढ परतवून लावण्यासाठी आक्रमक होण्याची गरज असून, ही लढाई अस्तित्वाची लढाई झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने शेतीला पाण्याची गरज निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत वीज कनेक्शन तोडायला येणाऱ्यांचे हात रोखा, असे आवाहन ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी केले. महावितरणला वठणीवर आणण्यासाठी आता मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले पाहिजेत. बहुतांश शेतीपंपांना मीटर बसविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मीटर नाही तर बिल भरणार नाही, अशी भूमिका आता घ्यायला हवी. महावितरणला आपल्या चुका आणि चोऱ्यामाऱ्या थांबविता येत नाहीत. म्हणून त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्याव्हिलिंग चार्जेस आकारणी बंद करा आणि दरवाढ रद्द करा.शेतीपंपास मीटर बसवा, अन्यथा वीज बिलाची आकारणी करू देणार नाही.शेतीपंपांचे मीटर रीडिंग घेऊनच बिलाची आकारणी करावी.वीज बिलाच्या पावत्या शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत.वीज गळती पूर्णपणे थांबवा, वीज चोरीवर नियंत्रण आणा.