शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

इस्लामपुरात लॉकडाऊन नव्हे मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : जिल्ह्यात १५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन आहे, मात्र इस्लामपुरात नागरिकांचा रस्त्यावरील वावर कमी होत नसल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : जिल्ह्यात १५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन आहे, मात्र इस्लामपुरात नागरिकांचा रस्त्यावरील वावर कमी होत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांनी नाकाबंदी करूनही त्यांना गुंगारा दिला जात आहे. त्यातच बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात भाजी विक्रेत्यांची झुंबड उडत आहे.

वाळवा तालुका कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत सर्वात पुढे आहे. तालुक्यात रोज दोनशेवर रुग्ण आढळून येत आहेत. काही खासगी रुग्णालयांनी रक्त, एक्स-रे, एचआरसीटी आदी तपासण्यांची सोय करून औषधोपचारही सुरू केले आहेत. त्यामुळे अशा रुग्णालयांकडे रुग्णांचा कल मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तेथे रुग्णांसह नातेवाईकांची गर्दी उसळत आहे.

शहरातील सर्व सीमांवर आणि प्रमुख चौकांत सकाळच्या सत्रात पोलिसांचा ताफा असतो. तेथे दोन ते तीन तास कारवाई होते. पोलिसांची कारवाई थांबल्यानंतर रस्त्यावर पुन्हा नागरिकांची वर्दळ दिसते. बाजार समितीने भाजीपाला, धान्याचे लिलाव बंद केले आहेत. मात्र पहाटे पाचपासून सातपर्यंत बाजार समितीच्या आवारात भाजीपाल्याचे बाहेरील व्यापारी येऊन मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तेथे भाजी विक्रेत्यांची झुंबड उडत आहे. बाजार आणि रस्त्यावरील भाजीपाला विक्री बंद असल्याने तेथे ग्राहकांचीही संख्या वाढत आहे. यावर बाजार समिती, नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांचे नियंत्रण राहिलेले नाही. असा मुक्तसंचार असल्यामुळे शहर व परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.

कोट

शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या चारचाकी व दुचाकीस्वारांची कसून चौकशी केली जाते. विवध कारणे सांगून नागरिक सुटका करून घेतात. काहींवर खटले दाखल करून दंड वसूल केला जातो, तरीही बरेचजण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

- अशोक जाधव, शहर वाहतूक निरीक्षक, इस्लामपूर