शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मोफत धान्यवाटप कमिशनवर डल्ला, प्रशासन-सेल्समनचे संगनमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 13:25 IST

दत्ता पाटील तासगाव : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात शासनाने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य ...

दत्ता पाटीलतासगाव : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात शासनाने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप केले. धान्य वाटपाच्या मोबदल्यात प्रतिकिलोला दीड रुपया कमिशन शासनाकडून देण्यात आले. मात्र, या कोट्यवधी रुपयांच्या कमिशनवर डल्ला मारण्याचा कारनामा चव्हाट्यावर आला आहे.प्रशासनाने टक्केवारीच्या मोबदला घेत, सेल्समनसोबत संगनमत केले. शासनाकडून आलेले कमिशन स्वस्त धान्य दुकानाचा परवाना असलेल्या संस्थेच्या नावावर जमा करण्याऐवजी त्या संस्थेत नोकरी करणाऱ्या सेल्समनच्या खात्यावर थेट वर्ग केले आहे. विशेष म्हणजे याबाबत संस्थाचालक अनभिज्ञ आहेत. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे.कोरोना काळात राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मदतीचा हात दिला. पहिल्या टप्प्यात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत जिल्ह्यात चार लाख सहा हजार ४०७ शिधापत्रिकाधारक, १८ लाख ४७ हजार ४८० लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात आला. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना २५ किलो गहू आणि १० किलो तांदूळ दिले. या धान्य वाटपाचा मोबदला म्हणून शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांना किलोला दीड रुपया कमिशन देण्यात आले.जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत धान्य वाटपाच्या मोबदल्यात  प्रशासनाने १० कोटी ५४ लाख आठ हजार ४७ हजार रुपयांचे कमिशन वर्ग केले. मात्र, या वाटपातच गौडबंगाल झाल्याचा प्रकार दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वाटपावेळी चव्हाट्यावर आला आहे. प्रशासनाने हे कमिशन धान्य दुकानाचा परवाना असणाऱ्या संस्थांच्या नावावर वर्ग करणे आवश्यक होते. मात्र, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ते संस्थांच्या ऐवजी, संस्थेत नोकरी करणाऱ्या सेल्समनच्या नावावर वर्ग करण्यात आले आहे. दुसऱ्या  टप्प्यात संस्थेच्या ना हरकत पत्राची मागणी झाली. त्यामुळे कमिशनमधील ही अनियमितता चव्हाट्यावर आली. जिल्हा पुरवठा विभागाने तालुकास्तरावरून आलेल्या माहितीनुसार अनुदान वर्ग केल्याचे सांगून त्यांची जबाबदारी झटकली आहे. मात्र तालुकास्तरावरून संस्थेऐवजी सेल्समनच्या खात्यांची माहिती गेलीच कशी, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.२५ टक्क्यांची चर्चाजिल्ह्यात सुमारे १७०० स्वस्त धान्य दुकाने आहेत. यापैकी ७० दुकाने संस्थांच्या माध्यमातून चालवली जातात. एकट्या तासगाव तालुक्यात ९७ दुकाने आहेत. त्यापैकी संस्थांची ४८, बचत गटांची १६, ग्रामपंचायतीचे एक आणि ३२ खासगी परवानाधारक दुकाने आहेत. संस्थेऐवजी सेल्समनच्या नावावर कमिशन जमा करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक सेल्समनकडून २५ टक्के रक्कम गोळा करून अधिकाऱ्यांचे खिसे गरम केल्याची चर्चा आहे. या संगनमतामुळेच वर्षभरापासून याबाबत कोणालाच थांगपता लागला नाही.रक्कम जमा करण्यासाठी तगादाधान्य वाटप करणाऱ्या संस्थांनी आता संबंधित सेल्समनना कमिशनची रक्कम संस्थेत भरण्यासाठी तगादा लावला आहे. काही सेल्समनना नोटीस बजावली असून रक्कम न भरल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.पहिल्या टप्प्यात दुकानांना मिळालेले तालुकानिहाय कमिशन...-    सांगली : १ कोटी २९ लाख ७ हजार ११९-    मिरज : १ कोटी २६ लाख ३५ हजार ६२३-    कवठेमहांकाळ : ६६ लाख ७९ हजार ८१०-    तासगाव : एक कोटी एक लाख ८९ हजार ६९-    आटपाडी : ६१ लाख ४६ हजार १५७-    जत : एक कोटी ३८ लाख २५९-    कडेगाव : ६४ लाख ९० हजार ९०५-    खानापूर : ७० लाख ६८ हजार ९०९-    पलूस : ७२ लाख ३६ हजार ७३३-    वाळवा : एक कोटी ५३ लाख ५८ हजार ८१९-    शिराळा : ६८ लाख ९५ हजार ६९-    एकूण : १० कोटी ५४ लाख ८ हजार ४७५

टॅग्स :Sangliसांगली