शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

ऊस वाहतूकदारांची मुकादमांकडून फसवणूक : आर्थिक फसगत होऊनही दाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:44 IST

एक तर ऊस तोडणी कामगार मिळत नाहीत आणि जे मिळतात, त्यांच्या मुकादमांना लाखो रुपये देऊनही मजूर ऊस तोडणीसाठी येत नाहीत. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्यांची आणि परिणामी शेतकºयांची

ठळक मुद्देपैसे घेऊनही मजूर नाहीत -वेळप्रसंगी वैयक्तिक मालमत्ताही गहाण ठेवून कर्ज फेडत असतो

आशुतोष कस्तुरे।कुंडल : एक तर ऊस तोडणी कामगार मिळत नाहीत आणि जे मिळतात, त्यांच्या मुकादमांना लाखो रुपये देऊनही मजूर ऊस तोडणीसाठी येत नाहीत. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्यांची आणि परिणामी शेतकºयांची फसवणूक केली जात आहे.

जिल्ह्यात ऊस तोडण्यासाठी जत, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, बार्शी, कर्नाटक आदी भागातून मजूर आणले जातात. साधारण प्रत्येक मजुरास ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम टोळीच्या मुकादमामार्फत दिली जाते. मुकादम मजुरांना मिळालेली सर्वच रक्कम देतो असे नाही. तो त्याचे कमिशन वजा करून देतो आणि ते मजूर कारखान्यांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी घेतो. त्यामुळे वाहन मालकांना त्याच्यावर विश्वास टाकावा लागतो.

मात्र गेल्या काही वर्षात या मुकादमांनी लाखो रुपये उचल घेऊनही कर्मचारी कारखान्यावर न पोहोचवल्याने, ऊस वाहतूक करणारे धास्तावल्याचे चित्र आजही पाहावयास मिळते. हे पैसे कारखान्याकडून दिले जातात. ऊस गाळपास आणून वाहतूकदार ती उचलीची रक्कम फेडत असतो. मात्र हे कामगारच न आल्याने घेतलेली उचल फेडण्यासाठी घरातील दागिने, वेळप्रसंगी वैयक्तिक मालमत्ताही गहाण ठेवून कर्ज फेडत असतो. यामुळे त्यांना तणावाचा सामना करावा लागतो.

याबाबत पलूस पंचायत समितीचे उपसभापती अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली ऊस वाहतूक संघटनांनी गेल्या काही दिवसांपूर्वी तहसीलदार राजेंद्र पोळ यांना भेटून निवेदन दिले होते. शासनाने मुकादमांची रीतसर नोंदणी शासनदरबारी करून घ्यावी व जेवढ्या कारखान्यांवर ऊस वाहतूकदारांची फसवणूक झाली आहे, त्यांची यादी घेऊन त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

कर्नाटक पोलिसांचे असहकार्यज्या लोकांनी ऊस वाहतूकदारांची फसवणूक केली आहे, त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीला (फसवणाऱ्याला) बंदी केले असल्याच्या तक्रारी कर्नाटक पोलिसात दिल्याचे प्रकार पाहावयास मिळत आहेत. कर्नाटक पोलिसांना महाराष्ट्र पोलीस सहकार्य करतात. परंतु कर्नाटक पोलीस महाराष्ट्र पोलिसांना तपासासाठी सहकार्य करत नाहीत.

कर्नाटक पोलिसात संबंधित मुकादमाच्या नातेवाईकांनी मुकादमाला डांबून ठेवल्याची तक्रार दाखल केली आहे. त्याची पडताळणी करण्यास कर्नाटक पोलीस आले होते. पण त्यांना येथे तसा कोणताही प्रकार दिसला नाही. त्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे दिसते.- जयश्री पाटील, सहायक पोलीस निरीक्षक

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने