शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सात दिवसात उचलला चार हजार टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:42 PM

सांगली : शहरातील महापूर ओसरण्यास आठवडाभरापूर्वी सुरूवात झाली. त्यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली. गेल्या सात दिवसात तब्बल चार ...

सांगली : शहरातील महापूर ओसरण्यास आठवडाभरापूर्वी सुरूवात झाली. त्यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली. गेल्या सात दिवसात तब्बल चार हजारहून अधिक टन कचरा उचलला गेला आहे. अजूनही पूरबाधित परिसरात कचऱ्याचे ढीग आहेत. एकेका रस्त्यावर तीन-चारदा स्वच्छता करूनही कचºयाचे ढीग हटता हटेनात. त्यात स्वच्छतेसाठी हजारो हात मदतीला आल्याने काही प्रमाणात का होईना, महापालिकेला दिलासा मिळाला आहे.महापुराच्या विळख्यात शहराचा ६० टक्के भाग सापडला होता. नागरी वस्तीसह व्यापार पेठेलाही पुराचा मोठा फटका बसला. सांगलीत कृष्णेने उच्चांकी ५८ फुटाची पातळी गाठली. त्यामुळे संपूर्ण जनजीवनावर पुराचा परिणाम झाला. गेल्या रविवारी पुराची पातळी स्थिर झाली, तर सोमवारपासून पूर ओसरण्यास सुरूवात झाली. पहिले दोन दिवस फूट-दोन फुटाने पातळी उतरली. त्यानंतर मात्र वेगाने पुराचे पाणी नदीपात्रात गेले.पुराचे पाणी ओसरलेल्या भागाची महापालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेतली. महापालिकेच्या हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मदतीला मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिकांसह राज्यातील नगरपालिकांची यंत्रणाही धावली. संत निरंकारी मंडळ, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, जनकल्याण समिती, निर्धार फौंडेशन अशा कित्येक सामाजिक संघटनाही स्वच्छतेत सहभागी झाल्या आहेत. हजारो हात स्वच्छतेसाठी सरसावले असले तरी, पुराची व्याप्ती पाहता, स्वच्छतेचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. गेल्या काही दिवसांत वखारभाग, शंभरफुटी, पत्रकारनगर, गणेशनगर, मारुती रोड, हरभट रोड, सराफकट्टा, गणपती पेठ, कापडपेठ आदीसह विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. घरे, दुकानातील भिजलेला, कुजलेला कचरा रस्त्यावर पडला होता. तो उचलण्यात आला. एकेका रस्त्यावर दोन, तीनदा कचरा उचलला तरी, अजूनही कचºयाचे ढीग रस्त्यावर पडतच आहेत. हा सारा कचरा उचलण्यास अजून पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागेल. अजूनही काही पूरग्रस्त व्यापारी व नागरिकांकडून घरांची, दुकानांची स्वच्छता सुरू आहे. विशेषत: बेसमेंटमधील दुकानांच्या स्वच्छतेला आता कुठे सुरूवात झाली आहे. त्यामुळे कचरा रस्त्यावर येऊन पडत आहे. त्याचा ताण यंत्रणेवर येत आहे. गेल्या सात दिवसात चार हजार टनाहून अधिक कचरा उचलला गेला आहे. दररोजच्या कचरा उठावापेक्षा सहापटीने अधिक कचरा उचलला जात आहे.मुंबईकरांना परतीचे वेधमुंबई महापालिकेचे ३५० हून अधिक कर्मचारी व अधिकारी सफाईसाठी सांगलीत आले आहेत. त्यांच्यासोबत अत्याधुनिक यंत्रसामग्रीही आहे. मुंबईसोबतच पुणे, पिंपरी-चिंचवड व इतर महापालिकाही मदतीला धावल्या आहेत. गेले सात दिवस ते सांगलीत कचरा उठाव, स्वच्छता करीत आहेत. मुंबईच्या सफाई कामगारांना आता परतीचे वेध लागले आहेत. ते परत गेल्यानंतरच खºयाअर्थाने महापालिकेच्या यंत्रणेवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाला आपल्या यंत्रणेचे नियोजन करण्याची गरज आहे. अजून एक अथवा दोन दिवस मुंबईचे कर्मचारी सांगलीत राहतील, असे सांगण्यात येत आहे.