शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सांगली जिल्ह्यातील चार हजार एसटी कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत, न्यायालयाच्या आदेशाचेही पालन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 11:53 IST

बारा ते तेरा तास काम करूनही पगार मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी

सांगली : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या जिल्ह्यातील चार हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पगार गेल्या चार महिन्यांपासून वेळेवर होत नाहीत. त्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या महिन्यात देखील १६ तारीख आली तरी कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. न्यायालयाने कर्मचाऱ्यांचे पगार १० तारखेच्या आत करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील त्याचे पालन होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावली आहे.आर्थिक अडचणीमुळे कवठेमहांकाळ आगारातील चालक भीमराव सूर्यवंशी यांनी बुधवारी आत्महत्या केली आहे. अशा घटनेनंतर तरी एसटी महामंडळ आणि शासनाला जाग येणार आहे का, असा सवाल संतप्त कामगारांनी बुधवारी केला. गेल्या चार महिन्यात एसटी कामगारांचे पगार वेळेवर होत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दैनंदिन खर्च भागवितानाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बारा ते तेरा तास काम करूनही पगार मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. न्यायालयाने महिन्याच्या १० तारखेच्या आत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला पाहिजे, अशी सूचना शासन आणि एसटी महामंडळ प्रशासनाला दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाचेही शासनाकडून पालन होत नसल्याबद्दल एसटी कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.म्हणूनच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांना महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने वेळेत पगार होण्याबाबत नोटीस बजावली आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचेही पालन झाले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत झालेच पाहिजे : अशोक खोतएसटी महामंडळाचे कर्मचारी सध्या एसटी फायद्यात आणण्यासाठी बारा ते तेरा तास राबत आहेत. या कर्मचाऱ्यांना शासनाने वेळेवर पगार देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे. पण, गेल्या तीन ते चार महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांचे पगारच वेळेवर होत नसल्यामुळे कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. एसटी महामंडळाने तातडीने पगार देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीST Strikeएसटी संप