शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सांगली जिल्ह्यातील चार हजार एसटी कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत, न्यायालयाच्या आदेशाचेही पालन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 11:53 IST

बारा ते तेरा तास काम करूनही पगार मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी

सांगली : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या जिल्ह्यातील चार हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पगार गेल्या चार महिन्यांपासून वेळेवर होत नाहीत. त्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या महिन्यात देखील १६ तारीख आली तरी कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. न्यायालयाने कर्मचाऱ्यांचे पगार १० तारखेच्या आत करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील त्याचे पालन होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावली आहे.आर्थिक अडचणीमुळे कवठेमहांकाळ आगारातील चालक भीमराव सूर्यवंशी यांनी बुधवारी आत्महत्या केली आहे. अशा घटनेनंतर तरी एसटी महामंडळ आणि शासनाला जाग येणार आहे का, असा सवाल संतप्त कामगारांनी बुधवारी केला. गेल्या चार महिन्यात एसटी कामगारांचे पगार वेळेवर होत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दैनंदिन खर्च भागवितानाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बारा ते तेरा तास काम करूनही पगार मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. न्यायालयाने महिन्याच्या १० तारखेच्या आत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला पाहिजे, अशी सूचना शासन आणि एसटी महामंडळ प्रशासनाला दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाचेही शासनाकडून पालन होत नसल्याबद्दल एसटी कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.म्हणूनच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांना महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने वेळेत पगार होण्याबाबत नोटीस बजावली आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचेही पालन झाले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत झालेच पाहिजे : अशोक खोतएसटी महामंडळाचे कर्मचारी सध्या एसटी फायद्यात आणण्यासाठी बारा ते तेरा तास राबत आहेत. या कर्मचाऱ्यांना शासनाने वेळेवर पगार देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे. पण, गेल्या तीन ते चार महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांचे पगारच वेळेवर होत नसल्यामुळे कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. एसटी महामंडळाने तातडीने पगार देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीST Strikeएसटी संप