शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

चार अधिकाऱ्यांना परत पाठविणार

By admin | Updated: February 26, 2015 00:07 IST

महापालिका सभेत ठराव : आणखी काही अधिकाऱ्यांबाबत निर्णय होणार

सांगली : प्रतिनियुक्तीवर आलेल्या राज्य शासनाच्या चार अधिकाऱ्यांना पुन्हा शासन सेवेत परत पाठविण्याचा ठराव बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यामध्ये पाणीपुरवठा अधिकारी जनार्दन गिरी, मुख्य लेखापरीक्षक एन. व्ही. कोंगळे, नगररचनाकार संचालक एस. के. साळवी, जलनिस्सारण अभियंता संजय कुलकर्णी यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा विभागासह अन्य विभागांतील आणखी काही अधिकाऱ्यांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे महापौर विवेक कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या प्रश्नोत्तरावेळी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या विषयावर चर्चा झाली. नगरसेवक सुरेश आवटी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील सदस्यांनी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला. जे अधिकारी महापालिकेचे काम करीत नसतील आणि त्यांना विनाकारण पोसण्याची वेळ महापालिकेवर येत असेल, तर अशा अधिकाऱ्यांना पुन्हा शासनाच्या सेवेत परत पाठविण्यात यावे, अशी मागणी आवटी यांच्यासह शेखर माने यांनी केली. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी या विषयावर सभेपूर्वीच टीका केली होती. प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना परत पाठविण्याची मागणी त्यांनीही केली होती. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी या ठरावाला एकमताने संमती दर्शविली. महापौरांनी याबाबतचा ठराव करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात चार अधिकाऱ्यांना शासनाकडे परत पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. सभेनंतर पत्रकारांशी बोलताना कांबळे म्हणाले की, महापालिकेच्या बिनकामाच्या अधिकाऱ्यांना आम्ही शासनाकडे परत पाठविण्याची भूमिका घेतली आहे. आपल्या अधिकाऱ्यांना संधी द्या!ज्या अधिकाऱ्यांना शासनाकडे परत पाठविले जाणार आहे, त्यांच्या जागेवर महापालिकेचे जे पात्र अधिकारी आहेत, त्यांच्या नियुक्तीबाबत प्राधान्याने विचार केला जावा, अशी मागणी सुरेश आवटी यांनी महापौरांकडे केली. त्याबाबतही आयुक्तांशी चर्चा करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी करणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.