शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

दिवाळीच्या चार दिवसात आता पावसाला उघडिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 13:19 IST

ऐन सणात उत्साहावर पाणी टाकत हजेरी लावलेल्या पावसाला आता दिवाळीच्या महत्त्वाच्या चार दिवसात उघडिप मिळेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. हा अंदाज खरा ठरला तर सणाचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देचार दिवस उघडिप, दिली आनंदाची बातमी भारतीय हवामान खात्याचा अंदाज, काहीठिकाणी ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता नाही

सांगली , दि. १७ : ऐन सणात उत्साहावर पाणी टाकत हजेरी लावलेल्या पावसाला आता दिवाळीच्या महत्त्वाच्या चार दिवसात उघडिप मिळेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. हा अंदाज खरा ठरला तर सणाचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत होणार आहे.

सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात आॅक्टोबरचा पंधरवडा पावसाच्या हजेरीने चिंब भिजला. ऐन सणामध्ये पावसाने नागरिकांचे हाल केले. सणाच्या उत्साहावरही पाणी पडले. बाजारपेठांमधील खरेदीवरही पावसाचा परिणाम झाला. दररोज सायंकाळी लागणारी पावसाची हजेरी विक्रेते व खरेदीदार नागरिकांसाठी खुपच डोकेदुखी ठरली होती. त्यामुळे यंदा दिवाळी पावसातच साजरी करावी लागणार की काय, अशी चिंता व्यक्त होत होती.

पावसावरील विनोदही सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. सणात तेवढी उघडिप मिळावी, अशी आशा बाळगलेल्या नागरिकांसाठी हवामान खात्याने मंगळवारी आनंदाची बातमी दिली.

हवामान खात्याच्या संकेतस्थळावर पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत पावसाची उघडिप राहणार आहे, मात्र ढगाळ वातावरण राहणार असल्याने या काळात ऊन-सावलीचा अनुभव नागरिकांना येणार आहे. ढगाळ वातावरण असले तरी चालेल, मात्र पाऊस नको, अशी बहुतांश लोकांची भावना आहे. त्यांची ही इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात येत्या चार दिवसात केवळ काहीठिकाणी ढगाळ वातावरण राहिल. पावसाची शक्यता नाही. २१ आॅक्टोबरला तुरळक सरी, त्यानंतर २२ आॅक्टोबरला दाट धुके आणि २३ आॅक्टोबरला पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पावसाबाबत लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीची रांगोळी, किल्ला, विद्युत रोषणाई आणि दिवे लावायचे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला होता. आता लोकांना या आनंदापासून वंचित रहावे लागणार नाही.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र