शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आटपाडीत साडेचार कोटींचे गौणखनिज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:57 IST

महसूल प्रशासनाने गेल्या १५ महिन्यात वाळूतस्करांवर धडक कारवाई करुन दंडात्मक कारवाईसह तब्बल ४ कोटी ३६ लाख ७४ हजार ३२९ रुपयांचे विक्रमी गौणखनिज जमा केले आहे. राज्यात प्रथमच वाळूतस्करी करताना जप्त केलेली वाहने परत न नेणाऱ्या ६३ वाहनांचा लिलाव करुन दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देआटपाडीत साडेचार कोटींचे गौणखनिज जप्तवाहनांचा लिलाव करुन दंडाची रक्कम जमा करण्यात येणार

अविनाश बाड आटपाडी : महसूल प्रशासनाने गेल्या १५ महिन्यात वाळूतस्करांवर धडक कारवाई करुन दंडात्मक कारवाईसह तब्बल ४ कोटी ३६ लाख ७४ हजार ३२९ रुपयांचे विक्रमी गौणखनिज जमा केले आहे. राज्यात प्रथमच वाळूतस्करी करताना जप्त केलेली वाहने परत न नेणाऱ्या ६३ वाहनांचा लिलाव करुन दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.तालुक्यात एकमेव असलेल्या माणगंगा नदीवर आणि गावा-गावातील ओढ्यातील वाळूवर डल्ला मारणाºया वाळूतस्करांची तालुक्यात मोठी साखळी आहे. या वाळूतस्करांचे गुप्तहेर दिवसरात्र तहसील कार्यालय परिसर, चौक आणि रस्त्यांवर बसून असतात. रात्री तहसील कार्यालयातून वाळूविरोधी पथकाची जीप हलली, की हे गुप्तहेर सावध होतात.

दुचाकीवरुन जरी महसूल कर्मचारी निघाले, तर चौका-चौकात वाळूतस्करांचे थांबलेले गुप्तहेर कोणत्या दिशेने कर्मचारी येत आहेत, हे मोबाईलवरुन पुढे सांगतात. कर्मचाऱ्यांचा सतत पाठलाग होत असल्याने तहसीलदार सचिन लंगुटे यांनी पोलीस ठाण्यात या गुप्तहेरांबद्दल तक्रार दिली. सतत वाळूतस्करी करणाऱ्या ४ जणांविरुद्ध गुन्हाही दाखल केला.अशा परिस्थितीतही महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यात ६० गावे आहेत आणि तलाठी मात्र १२ आहेत. तरीही या तलाठ्यांचे पथक तयार करुन एप्रिल २०१३ ते मार्च २०१९ या कालावधित ४९ वाहनांवर कारवाई केली. त्यांना ६९ लाख ७१ हजार ४०० रुपये दंड ठोठावला. त्यापैकी २५ वाहनधारकांनी २९ लाख ५४ हजार ३६० रुपये प्रत्यक्ष दंड भरला आहे.मात्र इतर वाहनधारकांनी जप्त केलेली वाहने नेली नाहीत. पथकाला वाहन सापडल्यानंतर चालक खोटे नाव, पत्ता सांगतात. पळून जातात. मग ही वाहने आणून रेशनच्या धान्याच्या गोदामाच्या परिसरात लावली जातात. आता तिथे नवीन वाहने उभी करायला जागा नाही. एवढी जप्त केलेल्या वाहनांची गर्दी झाली आहे.

सध्या तिथे ३ ट्रक, २५ ट्रॅक्टर आणि ३५ टेम्पो अशी वाहने आहेत. या वाहनधारकांना वारंवार नोटिसा काढूनही ते तहसील कार्यालयाकडे फिरकत नाहीत. अनेकांचे पत्ते बोगस असल्याने नोटिसा परत येत आहेत. यावर आता मोटार वाहन निरीक्षकांना बोलावून या वाहनांचे मूल्यांकन करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी वाहनांची येसप्रिंट आदी तांत्रिक माहिती घेण्यात आली आहे.

या वाहनांचा लिलाव करुन गौणखनिज दंडाची रक्कम शासनजमा करण्यात येणार आहे. यातील अनेक वाहने नवीन कोरी, सुस्थितीतील आहेत. त्यामुळे वाळूतस्करांची घाबरगुंडी उडाली आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली