शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात राजकारणासाठी विरोधकांची आदळ-आपट, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:43 IST

पाणी योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना विरोधकांनी नागरिकांना पाणी पुरवठा होत नसल्याचे सांगत केवळ राजकारणासाठी प्रशासनाला वेठीस धरत आदळ आपट सुरू केली असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे यांनी केला.

विटा : विटा नगरपालिकेच्या मावळत्या कौन्सिलने पाठपुरावा करून ३२ कोटी रुपये मंजूर करून घेतलेल्या आणि मुबलक व उच्च दाबाने पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन सुधारित पाणी पुरवठा योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम महिन्याभरामध्ये होईल. पाणी योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना विरोधकांनी नागरिकांना पाणी पुरवठा होत नसल्याचे सांगत केवळ राजकारणासाठी प्रशासनाला वेठीस धरत आदळ आपट सुरू केली असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे यांनी केला.भिंगारदेवे म्हणाले की, विटा शहराच्या ७० हजार लोकसंख्येसाठी प्रती मानसी १३५ लिटर म्हणजे प्रती दिन ९५ लाख लिटर पाणी गरज गृहीत धरली आहे. यासाठी विटा नगर परिषदेच्या मावळत्या कौन्सिलने राज्य शासनाकडून ३२ कोटी रुपये खर्चाची सुधारित पाणी योजना मंजूर केली आहे. या योजनेंतर्गत घोगांव येथील पाणी उपसा करण्यासाठी सध्याचे २२५ अश्वशक्तीचे तीन पंप बदलून प्रती ताशी ३ लाख लिटरपेक्षा जास्त उपसा क्षमता असलेले ३०० अश्वशक्तीचे तीन नवीन पंप बसविण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे.वस्तुस्थिती समजून न घेता शहरातील विरोधक या प्रश्नाचे राजकीय भांडवल करून शहरवासीयांची सहानुभूती मिळविण्याचा व गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विरोधकांनी राजकारणासाठी प्रशासनास वेठीस धरत आदळ-आपट करू नये, असा सल्ला माजी उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगली