शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कट्टर विरोधकांवर औपचारिक मैत्रीची वेळ

By admin | Updated: November 17, 2014 23:22 IST

नवी समीकरणे : राज्यातील बदलत्या घडामोडींचे जिल्ह्यात होताहेत परिणाम

सांगली : एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या भाजप व राष्ट्रवादीतील नेत्यांना आता एकमेकांशी जुळवून घेत मैत्रीची औपचारिकता पार पाडावी लागणार आहे. राज्यातील राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये झालेली जवळीक आता जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करू लागली आहे. सांगली जिल्ह्यात अनेक मतदारसंघात दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जोराचा संघर्ष झाला होता. एकमेकांवर टोकाचे आरोपही करण्यात आले. माजी मंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजय पाटील यांच्यातील राजकीय वैर तर राज्याला परिचित आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या राजकीय संन्यासाच्या पैजाही या दोन्ही नेत्यांनी लावल्या होत्या. टोकाचा संघर्ष व जहरी टीका करून एकमेकांना घायाळ करणाऱ्या या दोन्ही नेत्यांना आता राज्यातील बदलत्या समीकरणांबरोबर बदलावे लागणार आहे. यापूर्वीही एकदा त्यांनी एकत्र येऊन मैत्रीचा प्रयत्न केला होता. पाच-सहा वर्षे रडतखडत त्यांनी मैत्रीची औपचारिकता पूर्ण केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांच्यातील टोकाचा संघर्ष जिल्ह्याने पाहिला. राज्यात दोन्ही पक्षांचे सूत जुळल्याने त्यांनाही आता एकमेकांशी जमवून घ्यावे लागणार आहे. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत संजय पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्यावर टीका करणे टाळले होते. त्यांनी या कृतीतून आता औपचारिक मैत्रीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. खासदार राजू शेट्टी आणि आर. आर. यांच्यातही अनेकदा संघर्ष झाला. या दोन्ही नेत्यांनीही एकमेकांचे वस्त्रहरण केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपशी मैत्री केल्याने त्यांनाही आता या बदलत्या समीकरणांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. तासगाव तालुक्यात त्यांची संघटना आर. आर. यांच्याविरोधात संघर्ष करीत होती. आता नव्या समीकरणांमुळे हा विरोधही मावळणार का?, असा प्रश्न निर्माण होणार आहे. स्वाभिमानीच्या प्रत्येक नेत्याने आर. आर. यांच्याविरोधात भाषणे केली होती. त्यामुळेच या दोन्ही पक्षांमधील आगामी नात्याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शिवाजीराव नाईक आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्षावर या बदलत्या राजकारणाचे काय परिणाम होणार, हासुद्धा उत्सुकतेचा विषय आहे. जत तालुक्यातील एकमेकांविरोधात लढणारे विलासराव जगताप आणि प्रकाश शेंडगे यांचीही गोची नव्या समीकरणांमुळे होण्याची शक्यता आहे. सांगली, मिरज, कडेगाव-पलूस याठिकाणची दोन्ही पक्षांतील मैत्री यापूर्वीच घट्ट झाल्याने तिथे काही फरक पडणार नाही. अन्य मतदारसंघात याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम दिसण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आता भाजपला केलेल्या सहकार्याच्या गोष्टी खासगीत स्पष्टपणे सांगण्यास सुरुवात केली आहे.