शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कट्टर विरोधकांवर औपचारिक मैत्रीची वेळ

By admin | Updated: November 17, 2014 23:22 IST

नवी समीकरणे : राज्यातील बदलत्या घडामोडींचे जिल्ह्यात होताहेत परिणाम

सांगली : एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या भाजप व राष्ट्रवादीतील नेत्यांना आता एकमेकांशी जुळवून घेत मैत्रीची औपचारिकता पार पाडावी लागणार आहे. राज्यातील राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये झालेली जवळीक आता जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करू लागली आहे. सांगली जिल्ह्यात अनेक मतदारसंघात दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जोराचा संघर्ष झाला होता. एकमेकांवर टोकाचे आरोपही करण्यात आले. माजी मंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजय पाटील यांच्यातील राजकीय वैर तर राज्याला परिचित आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या राजकीय संन्यासाच्या पैजाही या दोन्ही नेत्यांनी लावल्या होत्या. टोकाचा संघर्ष व जहरी टीका करून एकमेकांना घायाळ करणाऱ्या या दोन्ही नेत्यांना आता राज्यातील बदलत्या समीकरणांबरोबर बदलावे लागणार आहे. यापूर्वीही एकदा त्यांनी एकत्र येऊन मैत्रीचा प्रयत्न केला होता. पाच-सहा वर्षे रडतखडत त्यांनी मैत्रीची औपचारिकता पूर्ण केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांच्यातील टोकाचा संघर्ष जिल्ह्याने पाहिला. राज्यात दोन्ही पक्षांचे सूत जुळल्याने त्यांनाही आता एकमेकांशी जमवून घ्यावे लागणार आहे. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत संजय पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्यावर टीका करणे टाळले होते. त्यांनी या कृतीतून आता औपचारिक मैत्रीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. खासदार राजू शेट्टी आणि आर. आर. यांच्यातही अनेकदा संघर्ष झाला. या दोन्ही नेत्यांनीही एकमेकांचे वस्त्रहरण केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपशी मैत्री केल्याने त्यांनाही आता या बदलत्या समीकरणांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. तासगाव तालुक्यात त्यांची संघटना आर. आर. यांच्याविरोधात संघर्ष करीत होती. आता नव्या समीकरणांमुळे हा विरोधही मावळणार का?, असा प्रश्न निर्माण होणार आहे. स्वाभिमानीच्या प्रत्येक नेत्याने आर. आर. यांच्याविरोधात भाषणे केली होती. त्यामुळेच या दोन्ही पक्षांमधील आगामी नात्याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शिवाजीराव नाईक आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्षावर या बदलत्या राजकारणाचे काय परिणाम होणार, हासुद्धा उत्सुकतेचा विषय आहे. जत तालुक्यातील एकमेकांविरोधात लढणारे विलासराव जगताप आणि प्रकाश शेंडगे यांचीही गोची नव्या समीकरणांमुळे होण्याची शक्यता आहे. सांगली, मिरज, कडेगाव-पलूस याठिकाणची दोन्ही पक्षांतील मैत्री यापूर्वीच घट्ट झाल्याने तिथे काही फरक पडणार नाही. अन्य मतदारसंघात याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम दिसण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आता भाजपला केलेल्या सहकार्याच्या गोष्टी खासगीत स्पष्टपणे सांगण्यास सुरुवात केली आहे.