शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चांगुलपणाचा प्रवाह उलट्या दिशेचा असतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : चांगले काम करणाऱ्यांना नेहमीच खडतर परिस्थितीतून जावे लागते. कारण चांगुलपणाचा प्रवास हा उलट्या दिशेचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : चांगले काम करणाऱ्यांना नेहमीच खडतर परिस्थितीतून जावे लागते. कारण चांगुलपणाचा प्रवास हा उलट्या दिशेचा असतो, असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी बुधवारी व्यक्त केले.

स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव कराडकर आणि मातोश्री शांता कराडकर स्मृती ‘सेवारती पुरस्कार’ प्रदान सोहळा बुधवारी सांगलीत पार पडला. यंदा हा पुरस्कार अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांना डॉ. भवाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे होते.

यावेळी भवाळकर म्हणाल्या की, समाजात चांगला आणि वाईटाचा प्रवाह हा निरंतर वाहत असतो. आपण नेहमी चांगुलपणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात कोणत्याही चांगल्या कामाला विरोध हा असतोच, परंतु त्या विरोधाकडे दुर्लक्ष करून आपण समाजजागृतीचे कार्य सुरू ठेवले पाहिजे. अंनिसच्या कार्यकर्त्यांना अद्यापही विरोध होतो. परंतु, ज्या ध्येयाने नरेंद्र दाभोलकर यांनी समितीची स्थापना केली त्यापासून जराही न ढळता त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवलेले कार्य कौतुकास्पद आहे.

गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, प्रवाहासमवेत सर्वच पोहत असतात. परंतु प्रवाहाच्या विरोधात पोहणे धैर्याचे काम असते. ते धाडस अंनिसने दाखविले आहे. त्यांचे कार्यकर्ते अविरत समाजहिताचे कार्य करीत असतात. प्रवाहाला झुगारून देणाऱ्यांना एक क्षणभरही विश्रांती घेता येत नाही. अंनिसचे काम अत्यंत मोलाचे आहे. त्यामुळेच आज त्याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विचारांमध्ये मतभेद असले तरी कोणाचाही व्देष न करता वाटचाल करणे अत्यंत महत्वाचे असते. प्रत्येकाने नेणिवेचे रुपांतर जाणिवेत करणे आवश्यक आहे.

डॉ. दिलीप शिंदे यांनी पुरस्कारप्राप्त राहुल थोरात यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश कराडकर यांनी केले तर आभार राजेश कराडकर यांनी मानले.

कार्यक्रमास प्रा. डॉ. बाबुराव गुरव, नामदेव माळी, अरूण दांडेकर, संजय ठिगळे, डॉ. संजय निटवे, प. रा. आर्डे, नामदेव भोसले, मुस्तफा मुजावर, डॉ. दिलीप शिंदे उपस्थित होते.

चौकट

विचार कृतीतून जिवंत ठेवला

राहुल थोरात म्हणाले, मला मिळालेला पुरस्कार हा जबाबदारीचा आहे. महाविद्यालयीन जीवनापासून अंनिसच्या कार्यात मी सहभागी झालो. दाभोलकर हे व्यक्ती नसून विचार आहेत. त्यांचा खून केल्याने अंनिसची चळवळ मागे पडेल असे सनातनींना वाटले. दाभोलकर असताना अंनिसच्या १५० शाखा होत्या. मात्र, हत्येनंतर त्या ३२० झाल्या आहेत. याचा अर्थच दाभोलकरांचा विचार प्रामुख्याने देशाच्या भावी पिढीला पटत आहे.