शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
2
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
3
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
4
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
5
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
6
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
7
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
8
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
9
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
10
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
11
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
13
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
14
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
15
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
16
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
17
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
18
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
19
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
20
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल

चांगुलपणाचा प्रवाह उलट्या दिशेचा असतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : चांगले काम करणाऱ्यांना नेहमीच खडतर परिस्थितीतून जावे लागते. कारण चांगुलपणाचा प्रवास हा उलट्या दिशेचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : चांगले काम करणाऱ्यांना नेहमीच खडतर परिस्थितीतून जावे लागते. कारण चांगुलपणाचा प्रवास हा उलट्या दिशेचा असतो, असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी बुधवारी व्यक्त केले.

स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव कराडकर आणि मातोश्री शांता कराडकर स्मृती ‘सेवारती पुरस्कार’ प्रदान सोहळा बुधवारी सांगलीत पार पडला. यंदा हा पुरस्कार अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांना डॉ. भवाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे होते.

यावेळी भवाळकर म्हणाल्या की, समाजात चांगला आणि वाईटाचा प्रवाह हा निरंतर वाहत असतो. आपण नेहमी चांगुलपणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात कोणत्याही चांगल्या कामाला विरोध हा असतोच, परंतु त्या विरोधाकडे दुर्लक्ष करून आपण समाजजागृतीचे कार्य सुरू ठेवले पाहिजे. अंनिसच्या कार्यकर्त्यांना अद्यापही विरोध होतो. परंतु, ज्या ध्येयाने नरेंद्र दाभोलकर यांनी समितीची स्थापना केली त्यापासून जराही न ढळता त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवलेले कार्य कौतुकास्पद आहे.

गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, प्रवाहासमवेत सर्वच पोहत असतात. परंतु प्रवाहाच्या विरोधात पोहणे धैर्याचे काम असते. ते धाडस अंनिसने दाखविले आहे. त्यांचे कार्यकर्ते अविरत समाजहिताचे कार्य करीत असतात. प्रवाहाला झुगारून देणाऱ्यांना एक क्षणभरही विश्रांती घेता येत नाही. अंनिसचे काम अत्यंत मोलाचे आहे. त्यामुळेच आज त्याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विचारांमध्ये मतभेद असले तरी कोणाचाही व्देष न करता वाटचाल करणे अत्यंत महत्वाचे असते. प्रत्येकाने नेणिवेचे रुपांतर जाणिवेत करणे आवश्यक आहे.

डॉ. दिलीप शिंदे यांनी पुरस्कारप्राप्त राहुल थोरात यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश कराडकर यांनी केले तर आभार राजेश कराडकर यांनी मानले.

कार्यक्रमास प्रा. डॉ. बाबुराव गुरव, नामदेव माळी, अरूण दांडेकर, संजय ठिगळे, डॉ. संजय निटवे, प. रा. आर्डे, नामदेव भोसले, मुस्तफा मुजावर, डॉ. दिलीप शिंदे उपस्थित होते.

चौकट

विचार कृतीतून जिवंत ठेवला

राहुल थोरात म्हणाले, मला मिळालेला पुरस्कार हा जबाबदारीचा आहे. महाविद्यालयीन जीवनापासून अंनिसच्या कार्यात मी सहभागी झालो. दाभोलकर हे व्यक्ती नसून विचार आहेत. त्यांचा खून केल्याने अंनिसची चळवळ मागे पडेल असे सनातनींना वाटले. दाभोलकर असताना अंनिसच्या १५० शाखा होत्या. मात्र, हत्येनंतर त्या ३२० झाल्या आहेत. याचा अर्थच दाभोलकरांचा विचार प्रामुख्याने देशाच्या भावी पिढीला पटत आहे.