शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंंचन’च्या थकीत वीज बिलाचे पाच हप्ते

By admin | Updated: March 16, 2017 23:36 IST

मुंबईतील बैठकीत निर्णय : बिल तात्काळ भरण्याचे आदेश; ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनांचे आवर्तन अडचणीत

सांगली : जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजना नियमित सुरू राहण्यासाठी थकीत वीज बिलाचे पाच हप्ते करण्याचा निर्णय मुंबईत घेण्यात आलेल्या बैठकीत झाला. वीज बिलाचा हप्ता आणि चालू बिल तात्काळ भरण्याचे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील नेत्यांनी बिले भरण्यास सहमती दर्शविली. मात्र थकबाकी भरली तरच सिंचन योजना पुढे चालू ठेवण्यात येतील, असे मंत्र्यांनी जिल्ह्यातील आमदारांना सांगितल्यामुळे, सिंचन योजनांचे आवर्तन पुढे चालू राहण्यात अडचण निर्माण झाली आहे.मुंबईत गुरूवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार पतंगराव कदम, आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, आ. मोहनराव कदम, आ. सुमनताई पाटील, अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले उपस्थित होते.कृष्णा आणि वारणा नदीतून वाहून जाणारे पाणी टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांना दिले जाते. म्हैसाळसाठी दोन टीएमसी, ताकारीसाठी एक टीमसी आणि टेंभूसाठी दीड टीएमसी, असे साडेचार टीएमसी पाणी दिले आहे. सिंचन योजनांच्या वीज बिलांचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. तिन्ही सिंचन योजना नियमित सुरु राहिल्यास भर उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने थकीत बिलांबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. सिंचन योजनांच्या बिलासाठी निधी देण्यात यावा, याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. थकबाकीपोटी शासनाकडून निधी देण्याचे जाहीर केले होते, मात्र रक्कम देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा प्रश्न जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित केला.म्हैसाळ सिंचन योजनेचे २६ कोटी रुपये थकीत बिल आहे. वेळोवेळी मुदत देऊनही ते भरण्यात आलेले नाही. भर उन्हाळ्यात योजना सुरु राहिल्या पाहिजेत, अशी मागणी आ. जगताप यांनी केली. जलसंपदामंत्री महाजन यांनी, थकीत बिलाचे पाच हप्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रत्येक हप्ता सहा कोटीचा असून चालू बिलही त्यासोबत भरण्याच्या सूचना दिल्या. हप्ता भरल्यानंतर योजनेचे आवर्तन कायम सुरु ठेवले जाणार आहे.टेंभू योजनेची चौदा कोटी, तर ताकारी योजनेची चार कोटी थकबाकी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज बिलांची थकीत रक्कम एकाच टप्प्यात भरता येणार नसल्याचे लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले. थकीत वीज बिलांचे हप्ते केले, तर शेतकऱ्यांचीही सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.तिन्ही सिंचन योजनांच्या थकीत बिलांचे पाच हप्ते करण्याचा निर्णय बैठकीत झाला. हप्ता आणि योजनांचे चालू बिल एकाचवेळी भरण्यात यावे, अशा सूचना जलसंपदामंत्री महाजन आणि ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिल्या. जिल्ह्यातील नेत्यांनीही हप्ते भरण्यास सहमती दर्शविली आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. भर उन्हाळ्यात तिन्ही योजना नियमित सुरु राहणे आवश्यक आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरुन मदत केली पाहिजे, अशी भूमिका महाजन यांनी मांडली. त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांत प्रबोधन करावे, असे सांगण्यात आले. शेतकऱ्यांकडून थकीत रक्कम भरण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे. थकबाकी न भरल्यास योजनांचा वीज पुरवठा कोणत्याहीक्षणी खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात सिंचन योजना बंद पडल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)‘आरफळ’चे पाणी जिल्ह्याला मिळणार कण्हेर (जि. सातारा) धरणातून आरफळ योजनेतून पाणी देण्यात येते. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने पिके करपून चालली आहेत. पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. सांगलीसह सातारा जिल्ह्याला ठरवून दिल्याप्रमाणे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. आरफळ योजनेचे पाणी सांगली जिल्ह्यासाठीही मिळाले पाहिजे, अशी भूमिका आमदार सुमनताई पाटील यांनी मांडली. त्यानुसार आरफळचे पाणी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.