शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

भाजपच्या मुलाखतींचा सांगलीत पहिल्यांदाच धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 23:20 IST

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी पहिल्यांदाच भाजपकडे इच्छुकांची मोठी गर्दी होती. यापूर्वी भाजपची उमेदवारी कार्यकर्त्यांच्या गळ्यात मारली जात होती; पण यंदा मात्र इच्छुकांची संख्या वाढल्याने रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शनात मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. मोटारसायकल रॅली, पदयात्रा, घोषणाबाजीने भाजपचे नेतेही सुखावले होते. दिवसभरात शंभरहून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या.महापालिका निवडणुकीसाठी भाजप इच्छुकांच्या मुलाखती येथील ...

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी पहिल्यांदाच भाजपकडे इच्छुकांची मोठी गर्दी होती. यापूर्वी भाजपची उमेदवारी कार्यकर्त्यांच्या गळ्यात मारली जात होती; पण यंदा मात्र इच्छुकांची संख्या वाढल्याने रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शनात मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. मोटारसायकल रॅली, पदयात्रा, घोषणाबाजीने भाजपचे नेतेही सुखावले होते. दिवसभरात शंभरहून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या.महापालिका निवडणुकीसाठी भाजप इच्छुकांच्या मुलाखती येथील कच्छी जैन भवनमध्ये झाल्या. पक्ष निरीक्षक रवी अनासपुरे, सांगलीचे प्रभारी अतुल भोसले, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, नीता केळकर उपस्थित होत्या.सकाळी दहा वाजल्यापासून इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मुलाखती दिल्या. पक्षाचे झेंडे, गळ्यात मफलर, टोप्या घालून इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन केले. उमेदवारांनी प्रभागातील आपल्या कामाचा, संपर्काचा आढावा नेत्यांसमोर मांडून आपल्यालाच उमेदवारी देण्यासाठी आग्रही मागणी केली. त्यांचे समर्थकही आपल्या उमेदवाराची बाजू मांडत होते. इच्छुकांनी गेल्या चार वर्षात पक्षासाठी केलेल्या कष्टाचा पाढाच वाचला. भाजपसाठी प्रसंगी काठ्या खाल्ल्याची आठवणही नेत्यांना करून दिली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीला राबल्याचा दाखला देत यंदा उमेदवारी आपल्यालाच हवी, असे साकडेही घातले.काहींनी तर भाजपसोबत हिंदुत्ववादी संघटनेत बऱ्याच वर्षापासून काम करण्याचे सांगत, या निवडणुकीत नव्या चेहºयांना संधी देण्याची मागणी केली. एकाच प्रभागातील काही इच्छुक स्वतंत्रपणे, तर काहींनी एकत्रित मुलाखती दिल्या. काहींनी उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाचे काम करण्याची ग्वाहीही दिली.जनतेचा कौल आमच्या बाजूनेच : संजयकाका पाटीलमहापालिकेतील सत्ताधाºयांना गेल्या पाच वर्षात शहराचा विकास करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला असून, जनतेचा कौल भाजपच्याच बाजूने असल्याचा दावा खा. संजयकाका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. महापालिकेत भाजपची सत्ता येणार आहे. पक्षाच्यावतीने केलेल्या सर्व्हेतही चांगल्या जागा मिळण्याचा अंदाज आहे. नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात कोट्यवधीचा निधी आला आहे. अमृत योजना मंजूर केली आहे. नगरोत्थानमधून निधी मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, याची जाणीव जनतेला झाली आहे. उमेदवारी मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. उमेदवारीसाठी भाजपमध्ये स्पर्धा राहील, पण इच्छुकांत संघर्ष होणार नाही, असेही पाटील म्हणाले.प्रमुख इच्छुक असेनगरसेवक युवराज बावडेकर, धीरज सूर्यवंशी, विक्रम सावर्डेकर, रणजित सावर्डेकर, अजिंक्य पाटील, सुब्राव मद्रासी, भारती दिगडे, हणमंत पवार, पापा बागवान, विजय हाबळे, शरद नलावडे, कौस्तुभ कुलकर्णी, लक्ष्मण नवलाई, दरिबा बंडगर, मुन्ना कुरणे, शशिकांत फल्ले, अशोक शेट्टी.