शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारणास प्रथम प्राधान्य - ‘टीमवर्क’ने कामे : अभिजित चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:13 IST

प्रशासकीय कामात मी ‘टीमवर्क’ला महत्त्व देतो. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊनच काम होईल. तरीही सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सध्या जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती

ठळक मुद्देखुलासा योग्य वाटला नाही, तर टाळाटाळ, हलगर्जीपणा करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सांगली : प्रशासकीय कामात मी ‘टीमवर्क’ला महत्त्व देतो. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊनच काम होईल. तरीही सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सध्या जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच, लवकरच होत असलेल्या निवडणुकीच्या कामकाजास सध्या तरी प्राधान्य असणार आहे, असे प्रतिपादन नूतन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना केले.

बुधवारी कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. चौधरी यांची सांगलीचेजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी रात्रीच त्यांनी मावळते जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडून कार्यभार स्वीकारला होता. गुरुवारी सकाळी प्रथमच ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण कार्यालय हजर होते. महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर, नूतन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विकास देशमुख यांनी डॉ. चौधरी यांचे स्वागत केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी मीनाज मुल्ला, विजया यादव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. स्वागतानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत, भविष्यातील कामकाजाचे नियोजन सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. येत्या काही महिन्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याने, त्याच्या योग्य नियोजनास प्राधान्य देणार आहे. आचारसंहितेअगोदर प्रभावी उपाययोजना करणार आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्याने अधिकारी, कर्मचाºयांच्या समन्वयाने निवडणुकीचे कामकाज करणार आहे.

जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, त्यांची सोडवणूक करण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत सविस्तर आढावा घेऊन कार्यवाही केली जाईल.प्रशासकीय कामकाज करताना टीमवर्कला महत्त्व देतो. त्यामुळे येथेही सर्वांना बरोबर घेऊनच कामकाज केले जाईल. मात्र, जे अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक कामास टाळाटाळ करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

सांगलीतही ‘टास्क फोर्स’ची स्थापनाजनतेची कामे लवकर व्हावीत यासाठी नियोजन करणार आहे. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हापूर महापालिकेत ‘टास्क फोर्स’ होता. त्या पद्धतीने येथेही त्याची स्थापना करणार आहे. कोणत्याही कामाला अधिकारी, कर्मचाऱ्यांना एक ‘टाईम बॉण्ड’ दिला जाईल. त्या मुदतीतही काम झाले नाही, तर त्याचा खुलासा अधिकारी, कर्मचाºयांना द्यावा लागेल. खुलासा योग्य वाटला नाही, तर टाळाटाळ, हलगर्जीपणा करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सांगलीत गुरूवारी नूतन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांचे महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी स्वागत केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली