शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

दुष्काळ निवारणास प्रथम प्राधान्य - ‘टीमवर्क’ने कामे : अभिजित चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:13 IST

प्रशासकीय कामात मी ‘टीमवर्क’ला महत्त्व देतो. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊनच काम होईल. तरीही सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सध्या जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती

ठळक मुद्देखुलासा योग्य वाटला नाही, तर टाळाटाळ, हलगर्जीपणा करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सांगली : प्रशासकीय कामात मी ‘टीमवर्क’ला महत्त्व देतो. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊनच काम होईल. तरीही सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सध्या जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच, लवकरच होत असलेल्या निवडणुकीच्या कामकाजास सध्या तरी प्राधान्य असणार आहे, असे प्रतिपादन नूतन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना केले.

बुधवारी कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. चौधरी यांची सांगलीचेजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी रात्रीच त्यांनी मावळते जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडून कार्यभार स्वीकारला होता. गुरुवारी सकाळी प्रथमच ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण कार्यालय हजर होते. महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर, नूतन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विकास देशमुख यांनी डॉ. चौधरी यांचे स्वागत केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी मीनाज मुल्ला, विजया यादव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. स्वागतानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत, भविष्यातील कामकाजाचे नियोजन सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. येत्या काही महिन्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याने, त्याच्या योग्य नियोजनास प्राधान्य देणार आहे. आचारसंहितेअगोदर प्रभावी उपाययोजना करणार आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्याने अधिकारी, कर्मचाºयांच्या समन्वयाने निवडणुकीचे कामकाज करणार आहे.

जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, त्यांची सोडवणूक करण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत सविस्तर आढावा घेऊन कार्यवाही केली जाईल.प्रशासकीय कामकाज करताना टीमवर्कला महत्त्व देतो. त्यामुळे येथेही सर्वांना बरोबर घेऊनच कामकाज केले जाईल. मात्र, जे अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक कामास टाळाटाळ करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

सांगलीतही ‘टास्क फोर्स’ची स्थापनाजनतेची कामे लवकर व्हावीत यासाठी नियोजन करणार आहे. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हापूर महापालिकेत ‘टास्क फोर्स’ होता. त्या पद्धतीने येथेही त्याची स्थापना करणार आहे. कोणत्याही कामाला अधिकारी, कर्मचाऱ्यांना एक ‘टाईम बॉण्ड’ दिला जाईल. त्या मुदतीतही काम झाले नाही, तर त्याचा खुलासा अधिकारी, कर्मचाºयांना द्यावा लागेल. खुलासा योग्य वाटला नाही, तर टाळाटाळ, हलगर्जीपणा करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सांगलीत गुरूवारी नूतन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांचे महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी स्वागत केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली