शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

डांगे महाविद्यालयात देशातीलपहिले मोटार प्रशिक्षण केंद्र

By admin | Updated: November 6, 2015 23:38 IST

शेखर गायकवाड : प्रशासनाचा प्रयोग; आज उद्घाटन

सांगली : जिल्हा प्रशासन व आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने आष्टा (ता. वाळवा) येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात मोटार प्रशिक्षण केंद्र सुरु केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व आरटीओ दशरथ वाघुले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. देशातील हा पहिला प्रयोग असून, प्रशिक्षण केंद्राचे शनिवारी सकाळी अकरा वाजता उद्घाटन केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले, वाहनांची संख्या जशी वाढत आहे, तशी अपघातांची संख्याही वाढत आहे. १८ ते ३५ वयोगटातील तरुण अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. महाविद्यालयात असतानाच विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती, वाहन कसे चालवावे, याची माहिती मिळावी, यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्याची संकल्पना चर्चेतून पुढे आली होती. अ‍ॅटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालयात हा उपक्रम राबविला, तर तो परिणामकारक ठरणार आहे. यासाठी डांगे महाविद्यालयाची निवड केली. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे व सचिव अ‍ॅड. चिमण डांगे यांच्यासमोर ही संकल्पना मांडण्यात आली. त्यांनीही लगेच होकार दिला. त्यानुसार देशातील पहिले मोटार प्रशिक्षण केंद्र डांगे महाविद्यालयात सुरु होत आहे.ते म्हणाले महाविद्यालयातील प्रयोगशाळेत मोटार प्रशिक्षणासाठी लागणारी यंत्रसामग्री, अवजारे व भित्तीचित्रे आणि प्रशिक्षकांची उपलब्धता असते. त्यामुळे प्रशिक्षण केंद्रात फारशी अडचण भासणार नाही. डांगे यांच्यासमोर संकल्पना मांडल्यानंतर त्यांनी केवळ २५ दिवसात सर्व तयारी पूर्ण केली. प्रशिक्षणासाठी दोन वाहने खरेदी केली. वाहन चालविण्याचा सराव करण्यासाठी नवीन सिम्युलेटर यंत्र बसविले आहे. तीस दिवसांचे हे प्रशिक्षण असणार आहे. विशेषत: मुलींनाही याचा फायदा होणार आहे. डांगे महाविद्यालयात शनिवारी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनास कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा, जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे आदी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)लाखो विद्यार्थ्यांना फायदादशरथ वाघुले म्हणाले, राज्यात ३६६ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यामध्ये बारा लाखाहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात हा उपक्रम सुरु झाला, तर लाखो विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, वाहन कसे चालवावे, याचे प्रशिक्षण मिळेल. महाविद्यालयीन जीवनातच याचे धडे मिळाल्याने, अपघाताला आळा बसेल. तसेच या विद्यार्थ्यांनी समाजातील चार लोकांचे प्रबोधन केले, तर फार मोठी क्रांती घडू शकते.