शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

सांगली जिल्ह्यात महिलांनी चालविले पहिले चारा दान केंद्र -: आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथे सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 14:17 IST

दाट होत चाललेले दुष्काळाचे ढग...पाणी, चाऱ्याविना डोळ्यातून बरसणाऱ्या धारा अशा वातावरणात ओढावलेल्या नैसर्गिक संकटाशी सामना करीत असलेल्या लाखो दुष्काळग्रस्तांचे लक्ष आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथील चारा दान केंद्राने वेधले आहे. चार व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्वछता व्यवस्थापन, जमा खर्चाचे नियोजन अशा सर्व गोष्टी महिलांच्या हाती आहेत

ठळक मुद्देतिनशेहून अधिक जनावरांची देखभाल, महिलांच्या हाती जनावरांच्या पालनपोषणाची दोर

सांगली : दाट होत चाललेले दुष्काळाचे ढग...पाणी, चाऱ्याविना डोळ्यातून बरसणाऱ्या धारा अशा वातावरणात ओढावलेल्या नैसर्गिक संकटाशी सामना करीत असलेल्या लाखो दुष्काळग्रस्तांचे लक्ष आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथील चारा दान केंद्राने वेधले आहे. चार व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्वछता व्यवस्थापन, जमा खर्चाचे नियोजन अशा सर्व गोष्टी महिलांच्या हाती आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या घुटुगडे वस्तीवरील या केंद्राने तिनशेहून अधिक जनावरांचे पालनपोषण सुरू केले आहे. 

जांभुळणी येथे उगम व बळीराजा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दि ६ मे २0१९ रोजी  'पुण्यकर्म' चारा दान केंद्र सुरू झाले. जनावरांच्या मालकांच्या नावाने तीनशेच्या आसपास जनावरांची भरती झाली. प्रत्यक्ष चारा वाटप सुरू झाले. मालकाचे नाव पुकारल्याबरोबर प्रत्येक वेळी कोणीतरी महिला पुढे येऊन चारा घेऊन जात होती. कुटुंबप्रमुख म्हणून नाव पुरुषाचे आणि चारा न्यायला येते त्या घरातली स्त्री. हे चित्र येथील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. संदेश पवार यांनी अनुभवले. सर्वच्या सर्व जनावरांचे मालक त्या घरचे पुरुष आहेत आणि इथे जनावरांचे पालनपोषण व काळजी घरची महिला करीत आहे. वास्तविक ग्रामीण भागात घर संभाळण्याबरोबरच घरातील पशुधन सांभाळण्याचा ताण महिलांवरच असतो. जांभुळणीतल्या चारा छत्रात डोंगर-दऱ्यातून चार पाच किलोमीटर पायपीट करून दररोज जनावरांना महिलाच घेऊन येत होत्या. त्यांना प्रचंड त्रास सोसावा लागतोय हे लक्षात येताच या महिलांना जवळ सोयीचे पडेल असे घुटुगडे वस्ती वरचे दुसरे ठिकाण पवार यांनी निवडले आणि त्या ठिकाणी दुसरे चारा छत्र फक्त महिलांनी पुढाकार घेऊन सुरू केले.

या चारा छत्रात जनावरांची नोंद संबंधित महिलेच्या नावावरच घेतली गेली आहे. या केंद्रात चारा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्वछता व्यवस्थापन, जमा खर्च आदी सर्व जबाबदाऱ्या केवळ महिला सांभाळत आहेत. या ठिकाणी जवळजवळ ८0  ते १00 जनावरे चारा खाण्यासाठी दररोज दाखल होत असून चारा छत्राचे नियोजन स्थानिक महिला चोखपणे करत आहेत. या चारा केंद्रासाठी दररोज पाच हजार लिटर पाणी पुरवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी वैशाली दत्तू मुढे यांनी घेतलेली असून जनाबाई एकनाथ घुटुगडे यांनी चारा व्यवस्थापन, मंगल पांडुरंग जुगदर यांनी स्वछता, ताई दत्तात्रय घुटूगडे यांनी जमा-खर्च, हिराबाई दादा घुटुगडे यांनी देखरेख,.वैशाली शहाजी घुटुगडे, सुवर्ण प्रकाश तरंगे यांनी मदतगार म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. महिलांच्या कर्तबगारीचे कौतुकच!याविषयी संदेश पवार म्हणाले की, अस्मानी संकटात खंबीरपणे संसार वाचवणाºया महिलांच्या कर्तबगारीचे कौतुक व्हावे, त्यांच्या धडपडीचा सन्मान व्हावा यासाठी सुवर्णा खंडेलवाल-जोशी यांच्या प्रेरणेतून व भाई संपतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव चारा छत्र यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. संवेदनशील लोकांनी यासाठी साठी साथ द्यावी. थोर महिलांचे स्मरणविशेष म्हणजे या ठिकाणच्या निवाऱ्यांना राजमाता जिजाऊ,  सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, कल्पना चावला यासारख्या थोर महिलांची नावे दिली आहे. त्यांच्या कार्याचा सचित्र सन्मान यानिमित्ताने करण्यात आला आहे. त्यामुळे हे केंद्र अधिक लक्षवेधी ठरले आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीLadies Special Serialलेडीज स्पेशल