शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
3
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
4
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
5
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
6
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
7
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
8
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
9
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
10
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
11
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
12
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
13
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
14
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
15
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
16
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
17
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
18
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
20
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार

‘सोनहिरा’कडून २४०८ रुपये अंतिम दर

By admin | Updated: September 26, 2015 00:19 IST

‘एफआरपी’ ३०८ प्रमाणे जमा होणार : साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत मोहनराव कदम यांची घोषणा

वांगी : सोनहिरा सहकारी साखर कारखाना उसाला ‘एफआरपी’प्रमाणे ३०८ रुपये सोमवार, दि. २८ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. एकूण प्रतिटन २४०८ रुपये अंतिम दर दिला आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी केले. वांगी (ता. कडेगाव) येथे कारखान्याच्या बावीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून कदम बोलत होते.यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, जिल्हा बॅँकेचे संचालक महेंद्र लाड, युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष इंद्रजित साळुंखे, भीमराव मोहिते, राम उगळे, पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठल मुळीक, सखाराम सूर्यवंशी, प्रकाश जाधव उपस्थित होते.कदम म्हणाले की, कारखान्याने मागील गळीत हंगामात ७ लाख ४६ हजार टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत शेतकऱ्याला प्रतिटन २१०० रूपये दिले असून उर्वरित ३०८ रुपये दि. २८ रोजी जमा करणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ताकारी व टेंभू योजनांमुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्यामुळे गाळप क्षमता प्रतिदिनी साडेसात हजार टन करण्यात येणार आहे. आसवनी प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येणार असून ती प्रतिदिन ६० हजार लिटर करण्यात येणार आहे. उसाला जादा दर देता यावा यासाठी प्रतिदिन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ९२ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. ते म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांसाठी ऊस ठिबक सिंचन करण्यासाठी मदत करणार आहे. यावेळी उपाध्यक्ष बापूसाहेब पाटील, पी. सी. जाधव, डी. के. कदम, जयसिंग कदम, मधुकर सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यकारी संचालक शरद कदम यांनी स्वागत केले. अनिल कदम यांनी नोटीस वाचन, तर संजय पाटील यांनी अहवाल वाचन केले. युवराज कदम यांनी आभार मानले. (वार्ताहर)शासनाने ५० टक्के दराने खते द्यावीतमहागाईमुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी रासायनिक खताचे दर ५० टक्के कमी करावेत, त्यामुळे ऊस उत्पादकांना उत्पादन खर्च कमी होऊन आर्थिक पाठबळ मिळण्यास मदत होणार आहे, असे मत मोहनराव कदम यांनी व्यक्त केले.टेंभू योजनांमुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्यामुळे गाळप क्षमता प्रतिदिनी साडेसात हजार टन करण्यात येणार आहे. आसवनी प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येणार असून ती प्रतिदिन ६० हजार लिटर करण्यात येणार आहे.यावर्षीपासून कमी क्षेत्रात जास्त ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला २५ हजार, १५ हजार व १० हजार अशी आडसाली, पूर्वहंगामी व सुरू उसासाठी बक्षिसे देण्यात येणार आहेत.