शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘सोनहिरा’कडून २४०८ रुपये अंतिम दर

By admin | Updated: September 26, 2015 00:19 IST

‘एफआरपी’ ३०८ प्रमाणे जमा होणार : साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत मोहनराव कदम यांची घोषणा

वांगी : सोनहिरा सहकारी साखर कारखाना उसाला ‘एफआरपी’प्रमाणे ३०८ रुपये सोमवार, दि. २८ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. एकूण प्रतिटन २४०८ रुपये अंतिम दर दिला आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी केले. वांगी (ता. कडेगाव) येथे कारखान्याच्या बावीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून कदम बोलत होते.यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, जिल्हा बॅँकेचे संचालक महेंद्र लाड, युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष इंद्रजित साळुंखे, भीमराव मोहिते, राम उगळे, पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठल मुळीक, सखाराम सूर्यवंशी, प्रकाश जाधव उपस्थित होते.कदम म्हणाले की, कारखान्याने मागील गळीत हंगामात ७ लाख ४६ हजार टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत शेतकऱ्याला प्रतिटन २१०० रूपये दिले असून उर्वरित ३०८ रुपये दि. २८ रोजी जमा करणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ताकारी व टेंभू योजनांमुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्यामुळे गाळप क्षमता प्रतिदिनी साडेसात हजार टन करण्यात येणार आहे. आसवनी प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येणार असून ती प्रतिदिन ६० हजार लिटर करण्यात येणार आहे. उसाला जादा दर देता यावा यासाठी प्रतिदिन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ९२ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. ते म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांसाठी ऊस ठिबक सिंचन करण्यासाठी मदत करणार आहे. यावेळी उपाध्यक्ष बापूसाहेब पाटील, पी. सी. जाधव, डी. के. कदम, जयसिंग कदम, मधुकर सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यकारी संचालक शरद कदम यांनी स्वागत केले. अनिल कदम यांनी नोटीस वाचन, तर संजय पाटील यांनी अहवाल वाचन केले. युवराज कदम यांनी आभार मानले. (वार्ताहर)शासनाने ५० टक्के दराने खते द्यावीतमहागाईमुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी रासायनिक खताचे दर ५० टक्के कमी करावेत, त्यामुळे ऊस उत्पादकांना उत्पादन खर्च कमी होऊन आर्थिक पाठबळ मिळण्यास मदत होणार आहे, असे मत मोहनराव कदम यांनी व्यक्त केले.टेंभू योजनांमुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्यामुळे गाळप क्षमता प्रतिदिनी साडेसात हजार टन करण्यात येणार आहे. आसवनी प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येणार असून ती प्रतिदिन ६० हजार लिटर करण्यात येणार आहे.यावर्षीपासून कमी क्षेत्रात जास्त ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला २५ हजार, १५ हजार व १० हजार अशी आडसाली, पूर्वहंगामी व सुरू उसासाठी बक्षिसे देण्यात येणार आहेत.