शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास वर्षांनंतरही खुजगावातील जमिनी पाटबंधारेच्याच नावावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:59 IST

विकास शहा । शिराळा : धरण चांदोली की खुजगाव, हा वाद होऊन धरण चांदोलीत झाले. परंतु खुजगाव येथे धरणासाठी ...

ठळक मुद्देधरणासाठी संपादित जमिनींचा प्रश्न। कसताहेत शेतकरी, पण अडचणी अनेक

विकास शहा ।शिराळा : धरण चांदोली की खुजगाव, हा वाद होऊन धरण चांदोलीत झाले. परंतु खुजगाव येथे धरणासाठी परिसरातील जमिनी संपादित केल्या होत्या. त्यास ५0 वर्षे पूर्ण होत आली तरी, जमिनी संबंधित शेतकऱ्यांना परत मिळाल्या नाहीत. शेकडो एकर जमिनी अजूनही पाटबंधारे विभागाच्याच नावे आहेत.

१९६९-७० च्या दरम्यान खुजगाव येथे धरणासाठी पाटबंधारे विभागाने जमिनी संपादित केल्या. त्यानुसार त्या सातबारावर ‘डेप्युटी इंजिनिअर, वारणा विभाग, इस्लामपूर’ हे नाव भोगवटदारसदरी नोंद झाले. त्यानंतर धरण खुजगाव की चांदोलीला, हा वाद सुरू झाला. अखेर धरण चांदोलीत झाले. तत्पूर्वी खुजगाव येथे धरणासाठी खुजगाव, पणुंब्रे, चरण, सोनवडे, करुंगली, मराठवाडी या गावांतील शेकडो एकर जमिनी संपादित केल्या. त्या पाटबंधारे विभागाच्या नावे आहेत. जमिनी शेतकरी कसत आहेत, मात्र भोगवटदार म्हणून पाटबंधारेचे नाव आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी अथवा विक्रीसाठी गरज पडल्यावर त्यांनी जमिनीचे साताबारा पाहिले असता, जमीन आपल्या नावावर नसल्याचे लक्षात आले.

खुजगाव येथील शेतकºयांनी तत्कालीन विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याकडे ही व्यथा मांडली. त्यावेळी त्यांनी खुजगाव येथील ५६४ शेतकºयांच्या सातबारावरील इतर हक्कात या जमिनीची खरेदी अथवा बिगरशेती खरेदी-विक्री करू नये, ही शर्त खुजगावऐवजी चांदोली येथे धरण झाल्याने रद्द करण्याची शिफारस केली होती. याची तपासणी करून ही अट रद्द करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांच्याकडे ६ आॅक्टोबर २०१० ला आदेश दिला होता. त्यानंतर २९ जून २०१२ ला जिल्हाधिकाºयांनी फक्त खुजगाव येथील निर्बंध उठविले. मात्र इतर गावांची कार्यवाही पूर्ण झालेली नाही.

जमीन शेतक-यांच्या नावावर नसल्याने कर्ज मिळत नाही. जमीन विकताही येत नाही. अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही. या शेतकºयांनी मंगळवार, दि. २४ रोजी आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे यांची भेट घेऊन मागणी सांगितली.

 

  • शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

खुजगाव धरण होणार म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. मात्र चांदोली येथे धरण झाले. जमिनी अद्याप पाटबंधारे विभागाच्याच नावावर आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गास जमिनी हस्तांतरित करणे, कर्ज काढणे अडचणीचे झाले आहे, असे राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे संघटक बाळासाहेब नायकवडी यांनी सांगितले.

 

आम्ही जमीन कसतो, मात्र जमीन आमच्या नावावर नाही. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. याचा विचार करुन आमच्या जमिनीवरील ही शर्त रद्द करावी.- धर्मराज शिंगमोडे, शेतकरी, खुजगाव.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार