शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

सांगलीत शेतकरी संघटनेतर्फे १२ रोजी देशव्यापी परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 14:15 IST

सांगली : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर देशव्यापी लढा निश्चित करण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी सांगलीत देशव्यापी शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद ...

ठळक मुद्देसांगलीत शेतकरी संघटनेतर्फे १२ रोजी देशव्यापी परिषदलढ्याची दीशा ठरणार: रघुनाथदादा पाटील

सांगली : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर देशव्यापी लढा निश्चित करण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी सांगलीत देशव्यापी शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, कापडविक्रीतून शेतकऱ्यांचे व भारतीयांचे शोषण करणाऱ्या ब्रिटीश सरकारविरुद्ध हुतात्मा बाबू गेणू यांनी १२ डिसेंबर १९३0 रोजी विदेशी कापडाने भरलेल्या ट्रकसमोर हौतात्म्य पत्करले होते. भारतीय शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक व शेतकऱ्यांचे पंचप्राण म्हणून ओळखले जाणारे शरद जोशी यांनीही १२ डिसेंबर २0१५ रोजी शेवटचा श्वास घेतला होता. त्यामुळे याच तारखेस शेतकरी हुतात्मा स्मृती परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेस पंजाबचे शेतकरी नेते सतनाम सिंग, समशेरसिंह दहिया, कन्हैय्यालाल सिहाग, लालबहादूर शास्त्री यांचे वंशज संजयसिंह नाथ, तामिळनाडूचे देवसिंग मणी, नित्या मोहोर, आंध्रप्रदेशचे जनरल रेड्डी आदी उपस्थित राहणार आहेत. सांगलीच्या रेल्वे स्थानकाजवळील कल्पतरु मंगल कार्यालयात १२ डिसेंबरला दुपारी १ वाजता परिषद होणार आहे.ऊसाला प्रतिटन चार हजार दर द्या, अन्यथा दोन कारखान्यांमधील अंतराची अटक काढून टाका, आपत्ती निवारण कायद्यात दुष्काळाचा, महापुराचा समावेश करून जिरायत शेतीला एकरी ५0 हजार रुपये, बागायत शेतीला १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, गोवंश हत्या बंदी, वन्यजीव संरक्षण, पाळीव प्राण्यांशी निर्दयी वागणूक, आवश्यक वस्तू कायदा, भू-संपादन, कमाल जमीन धारणा इत्यादी शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेची पुनर्स्थापना करण्यात यावी, सरसकट सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीज बिलातून मुक्त करावे, शेतकऱ्यांना बाजाराचे, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळायला हवे, शेतीमालावरील निर्यातबंदी उठवावी, रेडी रेकनर प्रमाणे शेतीला कर्जपुरवठा करावा आदी मागण्यांची चर्चा या परिषदेत केली जाणार आहे.शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना देशव्यापी लढ्याची दिशाही निश्चित केली जाणार आहे. अशा अनेक परिषदांचे आयोजन वेगवेगळ््या ठिकाणी केले जाणार आहे. सांगलीत कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तरप्रदेश याठिकाणचे शेतकऱ्यांचे नेते उपस्थित राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही परिषद अत्यंत महत्त्वाची व क्रांतिकारी ठरणार आहे, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली