शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत शेतकरी संघटनेतर्फे १२ रोजी देशव्यापी परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 14:15 IST

सांगली : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर देशव्यापी लढा निश्चित करण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी सांगलीत देशव्यापी शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद ...

ठळक मुद्देसांगलीत शेतकरी संघटनेतर्फे १२ रोजी देशव्यापी परिषदलढ्याची दीशा ठरणार: रघुनाथदादा पाटील

सांगली : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर देशव्यापी लढा निश्चित करण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी सांगलीत देशव्यापी शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, कापडविक्रीतून शेतकऱ्यांचे व भारतीयांचे शोषण करणाऱ्या ब्रिटीश सरकारविरुद्ध हुतात्मा बाबू गेणू यांनी १२ डिसेंबर १९३0 रोजी विदेशी कापडाने भरलेल्या ट्रकसमोर हौतात्म्य पत्करले होते. भारतीय शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक व शेतकऱ्यांचे पंचप्राण म्हणून ओळखले जाणारे शरद जोशी यांनीही १२ डिसेंबर २0१५ रोजी शेवटचा श्वास घेतला होता. त्यामुळे याच तारखेस शेतकरी हुतात्मा स्मृती परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेस पंजाबचे शेतकरी नेते सतनाम सिंग, समशेरसिंह दहिया, कन्हैय्यालाल सिहाग, लालबहादूर शास्त्री यांचे वंशज संजयसिंह नाथ, तामिळनाडूचे देवसिंग मणी, नित्या मोहोर, आंध्रप्रदेशचे जनरल रेड्डी आदी उपस्थित राहणार आहेत. सांगलीच्या रेल्वे स्थानकाजवळील कल्पतरु मंगल कार्यालयात १२ डिसेंबरला दुपारी १ वाजता परिषद होणार आहे.ऊसाला प्रतिटन चार हजार दर द्या, अन्यथा दोन कारखान्यांमधील अंतराची अटक काढून टाका, आपत्ती निवारण कायद्यात दुष्काळाचा, महापुराचा समावेश करून जिरायत शेतीला एकरी ५0 हजार रुपये, बागायत शेतीला १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, गोवंश हत्या बंदी, वन्यजीव संरक्षण, पाळीव प्राण्यांशी निर्दयी वागणूक, आवश्यक वस्तू कायदा, भू-संपादन, कमाल जमीन धारणा इत्यादी शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेची पुनर्स्थापना करण्यात यावी, सरसकट सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीज बिलातून मुक्त करावे, शेतकऱ्यांना बाजाराचे, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळायला हवे, शेतीमालावरील निर्यातबंदी उठवावी, रेडी रेकनर प्रमाणे शेतीला कर्जपुरवठा करावा आदी मागण्यांची चर्चा या परिषदेत केली जाणार आहे.शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना देशव्यापी लढ्याची दिशाही निश्चित केली जाणार आहे. अशा अनेक परिषदांचे आयोजन वेगवेगळ््या ठिकाणी केले जाणार आहे. सांगलीत कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तरप्रदेश याठिकाणचे शेतकऱ्यांचे नेते उपस्थित राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही परिषद अत्यंत महत्त्वाची व क्रांतिकारी ठरणार आहे, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली