शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया जूनपर्यंत रेंगाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 11:18 IST

शासनाने जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप प्राथमिक स्तरावरच असून याद्यांच्या लेखापरीक्षणाचे काम दोन दिवसात पूर्ण होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पोर्टल सुरू होऊन प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास बराच अवधी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे याचा बँकांच्या वसुलीवरही मोठा परिणाम होणार आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया जूनपर्यंत रेंगाळणारबँकांच्या वसुलीवरही याचा मोठा परिणाम

सांगली : शासनाने जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप प्राथमिक स्तरावरच असून याद्यांच्या लेखापरीक्षणाचे काम दोन दिवसात पूर्ण होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पोर्टल सुरू होऊन प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास बराच अवधी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे याचा बँकांच्या वसुलीवरही मोठा परिणाम होणार आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाख रुपयांच्या पीक कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी दोन लाखांवरील थकबाकीदार कर्जदार शेतकऱ्यांनाही माफी देण्याचे संकेत दिले होते. तरीही शासनाच्या २७ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकात केवळ २ लाखांपर्यंत थकबाकीदार असलेल्या कर्जदारांनाच माफी मिळेल, असे म्हटले आहे.

त्यामुळे सध्या केवळ २ लाखापर्यंतचेच कर्जदार या योजनेस पात्र आहेत. अशा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून त्याचे लेखापरीक्षण १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे सध्या लेखापरीक्षणाची लगबग सुरू आहे.लेखापरीक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये शासनाचे योजनेसंदर्भात पोर्टल सुरू होणार आहे. या पोर्टलवर संबंधित बँकांनी याद्या अपलोड करावयाच्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा शासनामार्फत याद्यांची तपासणी होऊन पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित करून त्यानंतर ती प्रसिद्ध केली जाईल.

त्यानंतरही पुन्हा शेतकऱ्यांच्या मान्य-अमान्यतेचा कल घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. सध्याची एकूण गती पाहिल्यास, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात येण्यास जून महिना उजाडण्याची चिन्हे आहेत.प्रक्रियेचे हे टप्पे कितीही जलदगतीने पूर्ण केले तरी, त्यात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. यापूर्वीच्या योजनेतही अशाप्रकारच्या अडचणींचा बांध तयार झाला होता. त्यामुळे अनेक महिने हा खेळ चालण्याची शक्यता आहे.

शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत असला तरी, त्याला तातडीने मदत देण्याचा उद्देश पूर्ण होण्यात अडचणी आहेत. त्यामुळे शासन, सहकार विभाग, बँका यांच्यासमोर कर्जमाफीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करणे हे एक आव्हान बनले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली