शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया जूनपर्यंत रेंगाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 11:18 IST

शासनाने जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप प्राथमिक स्तरावरच असून याद्यांच्या लेखापरीक्षणाचे काम दोन दिवसात पूर्ण होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पोर्टल सुरू होऊन प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास बराच अवधी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे याचा बँकांच्या वसुलीवरही मोठा परिणाम होणार आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया जूनपर्यंत रेंगाळणारबँकांच्या वसुलीवरही याचा मोठा परिणाम

सांगली : शासनाने जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप प्राथमिक स्तरावरच असून याद्यांच्या लेखापरीक्षणाचे काम दोन दिवसात पूर्ण होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पोर्टल सुरू होऊन प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास बराच अवधी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे याचा बँकांच्या वसुलीवरही मोठा परिणाम होणार आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाख रुपयांच्या पीक कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी दोन लाखांवरील थकबाकीदार कर्जदार शेतकऱ्यांनाही माफी देण्याचे संकेत दिले होते. तरीही शासनाच्या २७ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकात केवळ २ लाखांपर्यंत थकबाकीदार असलेल्या कर्जदारांनाच माफी मिळेल, असे म्हटले आहे.

त्यामुळे सध्या केवळ २ लाखापर्यंतचेच कर्जदार या योजनेस पात्र आहेत. अशा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून त्याचे लेखापरीक्षण १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे सध्या लेखापरीक्षणाची लगबग सुरू आहे.लेखापरीक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये शासनाचे योजनेसंदर्भात पोर्टल सुरू होणार आहे. या पोर्टलवर संबंधित बँकांनी याद्या अपलोड करावयाच्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा शासनामार्फत याद्यांची तपासणी होऊन पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित करून त्यानंतर ती प्रसिद्ध केली जाईल.

त्यानंतरही पुन्हा शेतकऱ्यांच्या मान्य-अमान्यतेचा कल घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. सध्याची एकूण गती पाहिल्यास, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात येण्यास जून महिना उजाडण्याची चिन्हे आहेत.प्रक्रियेचे हे टप्पे कितीही जलदगतीने पूर्ण केले तरी, त्यात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. यापूर्वीच्या योजनेतही अशाप्रकारच्या अडचणींचा बांध तयार झाला होता. त्यामुळे अनेक महिने हा खेळ चालण्याची शक्यता आहे.

शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत असला तरी, त्याला तातडीने मदत देण्याचा उद्देश पूर्ण होण्यात अडचणी आहेत. त्यामुळे शासन, सहकार विभाग, बँका यांच्यासमोर कर्जमाफीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करणे हे एक आव्हान बनले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली