शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

शेतकऱ्यांच्या नेत्यांनीच भाजपचे अस्तित्व संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 16:27 IST

दक्षिण महाराष्ट्रात शासन आणि साखर कारखानदारांविरोधात एकवटलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भाजपची ऊर्जा दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नेत्यांनीच भाजपचे अस्तित्व संपवलेपुन्हा साखर कारखानदारांना सुगीचे दिवस

अशोक पाटील इस्लामपूर : दक्षिण महाराष्ट्रात शासन आणि साखर कारखानदारांविरोधात एकवटलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भाजपची ऊर्जा दिली.

लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांचे पानिपत करण्यात आले. शेट्टी यांनी राष्ट्रवादी (साखर कारखानदार) यांच्याशी केलेला समझोता आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी परिधान केलेली भाजपची झूल वाळवा—शिराळ्यातील ऊस उत्पादकांना रुचली नाही. त्यामुळेच पुन्हा साखर कारखानदारांना सुगीचे दिवस आले आहेत.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बागणी जिल्हा परिषद मतदार संघातील निवडणूक चांगलीच गाजली. राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु राष्ट्रवादीचेच संभाजी कचरे यांनी बंडखोरी केली आणि जयंत पाटील आणि शिंदे गटातही दुही निर्माण झाली. त्यातच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांना विकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली.

येथूनच घराणेशाहीचा मुद्दा पुढे आला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतही फुटीची ठिणगी पडली. तेव्हापासून संघटनेतील धुसफूस वाढत गेली. एकमेकांवर आरोप—प्रत्यारोप झाले आणि या संघटनेतून खोत यांना बाहेर काढण्यात आले. यामुळे रयत क्रांती संघटनेचा जन्म झाला. या संघटनेला प्रथमत: इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही मोठी साथ दिली होती.वाळवा—शिराळ्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि आष्ट्याचे वैभव शिंदे यांनी भाजपला ताकद देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या तिघांची एकवटलेली ताकद भाजपचे एकनिष्ठ विक्रम पाटील, महाडिक गटाचे राहुल महाडिक यांना रुचली नाही. त्यातच नगराध्यक्ष पाटील आणि मंत्री खोत यांच्यातही काही कारणांनी मतभेद निर्माण झाले.

कालांतराने त्यांच्यातही फूट पडली. यानंतर महाडिक आणि विक्रम पाटील यांनी मंत्री खोत यांच्याशी संपर्क वाढवत नगराध्यक्ष पाटील यांना एकाकी पाडले. यामुळेच अंतिम टप्प्यापर्यंत भाजपच्या पदरात असलेली विधानसभेची उमेदवारी शिवसेनेकडे वर्ग झाली. याचे खापर मंत्री खोत यांच्यावरच फोडले जात आहे.मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या नावाचा वापर करुन मोहिते बंधूंनी मोठ्या प्रमाणात कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय सुरु केला. सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. परंतु वर्षभरातच हा फसवणुकीचा गोरखधंदा उजेडात आला. या घोटाळ्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेच मुख्य असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी करुन खळबळ माजवली होती. परंतु विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी मात्र या कडकडनाथप्रश्नी ब्र शब्दही काढला नाही. त्यामुळेच विरोधात असलेल्या अपक्ष निशिकांत पाटील आणि शिवसेनेचे गौरव नायकवडी यांना चांगली मते मिळाली.शिराळा मतदार संघातही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उघडपणे भाजपला आणि आतील बाजूने महाडिक गटाला ताकद दिली. इस्लामपूर मतदार संघात शिवसेनेचा प्रचार करण्यात खोत आघाडीवर होते. परंतु कामेरी येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत मंत्री खोत यांचा आवाज का दबला गेला, हे अनुत्तरीत आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगलीSadabhau Khotसदाभाउ खोत