शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नेत्यांनीच भाजपचे अस्तित्व संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 16:27 IST

दक्षिण महाराष्ट्रात शासन आणि साखर कारखानदारांविरोधात एकवटलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भाजपची ऊर्जा दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नेत्यांनीच भाजपचे अस्तित्व संपवलेपुन्हा साखर कारखानदारांना सुगीचे दिवस

अशोक पाटील इस्लामपूर : दक्षिण महाराष्ट्रात शासन आणि साखर कारखानदारांविरोधात एकवटलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भाजपची ऊर्जा दिली.

लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांचे पानिपत करण्यात आले. शेट्टी यांनी राष्ट्रवादी (साखर कारखानदार) यांच्याशी केलेला समझोता आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी परिधान केलेली भाजपची झूल वाळवा—शिराळ्यातील ऊस उत्पादकांना रुचली नाही. त्यामुळेच पुन्हा साखर कारखानदारांना सुगीचे दिवस आले आहेत.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बागणी जिल्हा परिषद मतदार संघातील निवडणूक चांगलीच गाजली. राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु राष्ट्रवादीचेच संभाजी कचरे यांनी बंडखोरी केली आणि जयंत पाटील आणि शिंदे गटातही दुही निर्माण झाली. त्यातच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांना विकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली.

येथूनच घराणेशाहीचा मुद्दा पुढे आला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतही फुटीची ठिणगी पडली. तेव्हापासून संघटनेतील धुसफूस वाढत गेली. एकमेकांवर आरोप—प्रत्यारोप झाले आणि या संघटनेतून खोत यांना बाहेर काढण्यात आले. यामुळे रयत क्रांती संघटनेचा जन्म झाला. या संघटनेला प्रथमत: इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही मोठी साथ दिली होती.वाळवा—शिराळ्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि आष्ट्याचे वैभव शिंदे यांनी भाजपला ताकद देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या तिघांची एकवटलेली ताकद भाजपचे एकनिष्ठ विक्रम पाटील, महाडिक गटाचे राहुल महाडिक यांना रुचली नाही. त्यातच नगराध्यक्ष पाटील आणि मंत्री खोत यांच्यातही काही कारणांनी मतभेद निर्माण झाले.

कालांतराने त्यांच्यातही फूट पडली. यानंतर महाडिक आणि विक्रम पाटील यांनी मंत्री खोत यांच्याशी संपर्क वाढवत नगराध्यक्ष पाटील यांना एकाकी पाडले. यामुळेच अंतिम टप्प्यापर्यंत भाजपच्या पदरात असलेली विधानसभेची उमेदवारी शिवसेनेकडे वर्ग झाली. याचे खापर मंत्री खोत यांच्यावरच फोडले जात आहे.मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या नावाचा वापर करुन मोहिते बंधूंनी मोठ्या प्रमाणात कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय सुरु केला. सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. परंतु वर्षभरातच हा फसवणुकीचा गोरखधंदा उजेडात आला. या घोटाळ्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेच मुख्य असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी करुन खळबळ माजवली होती. परंतु विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी मात्र या कडकडनाथप्रश्नी ब्र शब्दही काढला नाही. त्यामुळेच विरोधात असलेल्या अपक्ष निशिकांत पाटील आणि शिवसेनेचे गौरव नायकवडी यांना चांगली मते मिळाली.शिराळा मतदार संघातही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उघडपणे भाजपला आणि आतील बाजूने महाडिक गटाला ताकद दिली. इस्लामपूर मतदार संघात शिवसेनेचा प्रचार करण्यात खोत आघाडीवर होते. परंतु कामेरी येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत मंत्री खोत यांचा आवाज का दबला गेला, हे अनुत्तरीत आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगलीSadabhau Khotसदाभाउ खोत