शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यकर्त्यांमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST

वांगी : राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या राज्यकर्त्यांनी घडवून आणलेल्या हत्याच आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरविण्याचे काम राज्यकर्ते करीत ...

वांगी : राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या राज्यकर्त्यांनी घडवून आणलेल्या हत्याच आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरविण्याचे काम राज्यकर्ते करीत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केला. वांगी (ता. कडेगाव) येथील शेतकरी संघटनेच्या जनप्रबोधन यात्रा सभेत ते बोलत होते.

रघुनाथ पाटील म्हणाले, आमच्या शेतीमालाचे पैसे शासनाकडूनच येणे आहेत. त्यामुळे शेतकरी कोणतेही कर्ज भरणार नाही. शेतकऱ्यांना दिवसा व योग्य दाबाने शेतीपंपास वीज मिळाली पाहिजे. शेतकरी लुटीचे कायदे रद्द करावेत. शासनाने शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीज बिलातून मुक्त करावे. दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी. बाजाराचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्यावे. शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला ४० रुपये व म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाव द्यावा व उसाला प्रतिटन ४ हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे. या आमच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यकर्त्यांना बाहेर फिरू न देण्यासाठी आंदोलन हाती घेणार, असे ते म्हणाले.

क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष शिवाजीराव नांदखीले, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील, कडेगाव तालुका अध्यक्ष परशुराम माळी यांची भाषणे झाली.

यावेळी भाऊसाहेब पवार, शिवाजी राजमाने, रामचंद्र जंगम, विलास कदम, सर्जेराव थोरात, गणेश गायकवाड, विजय माळी, अभिजित कांबळे व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

फोटो-०३वांगी०१