शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यकर्त्यांमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST

वांगी : राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या राज्यकर्त्यांनी घडवून आणलेल्या हत्याच आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरविण्याचे काम राज्यकर्ते करीत ...

वांगी : राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या राज्यकर्त्यांनी घडवून आणलेल्या हत्याच आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरविण्याचे काम राज्यकर्ते करीत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केला. वांगी (ता. कडेगाव) येथील शेतकरी संघटनेच्या जनप्रबोधन यात्रा सभेत ते बोलत होते.

रघुनाथ पाटील म्हणाले, आमच्या शेतीमालाचे पैसे शासनाकडूनच येणे आहेत. त्यामुळे शेतकरी कोणतेही कर्ज भरणार नाही. शेतकऱ्यांना दिवसा व योग्य दाबाने शेतीपंपास वीज मिळाली पाहिजे. शेतकरी लुटीचे कायदे रद्द करावेत. शासनाने शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीज बिलातून मुक्त करावे. दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी. बाजाराचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्यावे. शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला ४० रुपये व म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाव द्यावा व उसाला प्रतिटन ४ हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे. या आमच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यकर्त्यांना बाहेर फिरू न देण्यासाठी आंदोलन हाती घेणार, असे ते म्हणाले.

क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष शिवाजीराव नांदखीले, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील, कडेगाव तालुका अध्यक्ष परशुराम माळी यांची भाषणे झाली.

यावेळी भाऊसाहेब पवार, शिवाजी राजमाने, रामचंद्र जंगम, विलास कदम, सर्जेराव थोरात, गणेश गायकवाड, विजय माळी, अभिजित कांबळे व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

फोटो-०३वांगी०१