शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

बावचीत पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:19 IST

गोटखिंडी : बावची (ता. वाळवा) येथील बावची-गोटखिंडी रस्त्यावर पाटील वस्तीवरील शेतकरी उदय रामचंद्र पाटील (वय ४६, रा. बावची) हे ...

गोटखिंडी : बावची (ता. वाळवा) येथील बावची-गोटखिंडी रस्त्यावर पाटील वस्तीवरील शेतकरी उदय रामचंद्र पाटील (वय ४६, रा. बावची) हे सिंगल फेजची मोटर सुरू करण्यासाठी गेले असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. विहिरीतील पाणी काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर १७ तासांनंतर त्यांचा मृतदेह सापडला.

उदय पाटील हे बावची-गोटखिंडी रस्त्यावरील वस्तीवर गेले होते. रविवारी सायंकाळी त्यांनी जनावरांच्या धारा काढल्या. शेतातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ते सिंगल फेजची मोटर सुरू करण्यासाठी विहिरीकडे गेले होते. बराच वेळ ते न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शाेध सुरू केला. विहिरीवर पाहिले असता तेथे फक्त बॅटरीच मिळून आली. रात्रीच जीवरक्षक पथकाला पाचारण करून विहिरीत शाेध घेतला; पण रात्रीची वेळ असल्याने शाेधकार्यात अडथळे येऊ लागले. सोमवारी सकाळपासून जनरेटर, इंजिनवर चार विद्युत मोटरी सुरू करून विहिरीतील पाणी उपसा करण्यात आला. सहा तासांच्या परिश्रमानंतर विहिरीतील गाळात रुतलेला उदय पाटील यांचा मृतदेह मिळून आला. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. या घटनेची नोंद आष्टा पोलिसांत झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

फाेटो : २५ गाेटखिंडी १

बावची-गोटखिंडी रस्त्याच्या विहिरीत पडून शेतकरी उदय पाटील यांचा मृत्यू झाला.

फाेटाे : २५ उदय पाटील (सिंगल)